Maharashtra Weather :कोकणात थंडीच प्रमाण वाढल..तापमानाचा पारा घसरला मुंबईसह विदर्भ-मराठवाड्यातही जोरदार थंडी

रत्नागिरीत थंडीची लाट; दापोलीत मिनी महाबळेश्वरमध्ये पारा फक्त ७.४°C रत्नागिरी – उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. राज्यातील हवामानातील चढ-उतारामुळे कोकणासह विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईत तापमानात घट झाली आहे.राज्यभर जोरदार थंडीच वातावरण पहायला मिळत आहे.. कोकणात पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवत असून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहर परिसरात तापमान फक्त ७.४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले आहे. या ठिकाणाला स्थानिक लोक “मिनी महाबळेश्वर” म्हणून ओळखतात.

मागील पाच ते सहा दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी काहीशी कमी जाणवत होती, पण पुन्हा एकदा पारा घसरल्याने थंडीची झळ लागली आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे विदर्भ-मराठवाड्यात गारठा जाणवत असून मुंबईतही तापमानात घट झाली आहे.
थंडीमुळे कोकणातील बागायतदारांना काहीशी दिलासा मिळाला आहे. आंबा आणि काजू बागायतदारांसाठी थंड हवामान फायदेशीर ठरत असून दिवसभर सूर्यप्रकाशामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते. मागील काही दिवस ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती, पण आता वातावरण सुधारल्याने बागायतदारांचा मनाचा बोजा हलका झाला आहे.

राज्यातील किनारपट्टी भागांमध्ये पावसाळी आणि दमट हवामान अनुभवायला मिळत असले तरी, थंडीच्या लाटेमुळे गारठ्याचा अनुभव राज्यभर वाढला आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितले की उत्तर भारतातील थंडीची लाट काही दिवस चालू राहणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे.
Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर