मागील तीन महापालिका निवडणुकांच्या तुलनेत यंदा उमेदवारांची संख्या घटली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांसह अपक्ष अशाप्रकारे एकूण १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.मात्र, उमेदवारांची ही आकडेवारी मागील तीन सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत सर्वांत कमी नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत युती, महायुती आणि आघाडी झाल्याने यंदा उमेदवारांच संख्या तसेच अपक्षांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंदा १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, मात्र मागील सन २०१७मध्ये २२१७ उमेदवार, सन २०१२मध्ये २२३२ उमेदवार आणि सन २००७च्या सार्वत्रिक निवडणुकीत २३७६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मागील चार सार्वत्रिक निवडणुकांचा अंदाज घेतल्यास यंदाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांचा आकडा हा कमी होण्यामागे युती, महायुती, महाविकास आघाडी हेच प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आणि भाजपा महायुती, उबाठा आणि मनसे युती, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी यामुळे तसेच यंदा निवडणूक खर्चाची मर्यादा १५ लाखांपर्यंत नेली असली तरी आता निवडणूक लढवणे पहिल्यासारखे सोपे नसल्याने सुरुवातीला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणे आणि मगे घेणे या तुलनेत अपक्षांनी यंदा मोठ्याप्रमाणात अर्ज न भरल्यामुळे हे उमेदवारांचे प्रमाण घटल्याचे बोलले जात आहे.


सन २०१७च्या निवडणुकीत यापूर्वी युतीमध्ये लढणारे भाजपा आणि शिवसेना प्रथमच स्वतंत्र तथा स्वबळावर लढले होते. त्यामुळे मागील निवडणुकीतील अपक्षांनी तसेच बंडखोरांनी अर्ज मागे घेतल्यानंतर २२७५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले होते. त्याआधी युती आणि विकास आघाडीसह इत पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत असल्याने उमेदवारांची संख्या वाढत होती. यंदा मनसे आणि उबाठा जे २२७ जागांवर स्वतंत्र लढतात, त्यांची युती झाल्याने त्यांच्या उमेदवारांची संख्या, घटली तसेच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी झाल्याने सर्वच जागा लढवणाऱ्या या पक्षाच्या जागा काही प्रमाणात विभागल्या गेल्या.तसेच भाजपाच्या बाबतीत हेच झाले आहे. शिवसेना पक्ष यंदा प्रथमच महापालिका निवडणूक लढवत आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची संख्या अधिक वाढली असली तरी युती आणि आघाडी तसेच महायुतीमध्ये लढल्याने यंदा उमेदवारांची संख्या मोठ्याप्रमाणात घटल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.



सार्वत्रिक निवडणुकीतील एकूण उमेदवाराची संख्या


सन २००७ : २३७६


सन २०१२ : २२३२


सन २०१७ : २२७५


सन २०२६ : १७००

Comments
Add Comment

Panchkula Murder Case : पंचकुलात खळबळ! मोलकरणीनेच केली रिटायर्ड कॅप्टनच्या पत्नीची हत्या; सीसीटीव्हीमुळे बिंग फुटले

Haryana : हरियाणामधील पंचकुला येथे घडलेल्या एका थरारक आणि खळबळजनक हत्याप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Eknath Shinde : 'शिवसेना कोणाची?' जनतेनेच दिला कौल; ४० चे ६० आमदार करून जनतेने शिक्कामोर्तब केलं

मुंबई : शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Amitabh Bachchan : "शूट चुकवलं असतं तर माझी..."; KBC साठी सलग २४ तास काम! ८३ व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांच्या जिद्दीला सलाम

मुंबई : वयाच्या ८३व्या वर्षीही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि शिस्त