उबाठाने वचननाम्यातून मराठी माणूस, हिंदू, हिंदुत्व शब्द वगळले

शिवसेनेची टीका; मराठीसाठी एक झालेल्या ठाकरेंच्या जाहीरनाम्यात इंग्रजीचाच भडीमार


मुंबई : मराठीसाठी एकत्र आलेल्या उबाठा आणि मनसेने निवडणूक वचननाम्यात ४० टक्के इंग्रजी शब्दांचा वापर केला. विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी वचननाम्यातून मराठी माणूस, हिंदु, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट शब्द वगळले, या वचननाम्यावर बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव असल्याची घणाघाती टीका शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी केली. मराठीऐवजी दुसऱ्या भाषेचा वापर केल्यास खळखट्याक करणारे आता वचननाम्यातून मराठीची गळचेपी करणाऱ्यांना धडा शिकवणार का, असा सवाल शेवाळे यांनी केला.


बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेवाळे म्हणाले की, स्वत:ला हिंदुह्रदयसम्राटांचा वारस समजणाऱ्यांनी विशिष्ट समाजाला खूश करणाऱ्यासाठी वचननाम्यात मराठी, हिंदू, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट हे शब्द वगळले. वचननाम्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे पण त्यात आत्मा नाही, अशी घणाघाती टीका शेवाळे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर आणि सन्मान न करणारा उबाठा मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा हा शिवसैनिकाला आणि मराठी माणसाला वेदना देणारा आहे, असे शेवाळे म्हणाले. संपूर्ण वचननाम्यात हिंदुह्रदयसम्राट असा उल्लेख टाळून उबाठाने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षातच अवमान केला आहे, असे शेवाळे म्हणाले. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मुंबईत वैद्यकीय महाविद्याल, कोळीवाड्यांची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय़ का नाही घेतले, असा सवाल शेवाळे यांनी यावेळी उपस्थित केला. आजचा वचननामा म्हणजे बालकांना वाचवायचा पालकांनी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका शेवाळे यांनी केली.


मराठी रंगभूमीसाठी दालन, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेत नोकरी देणे, स्वातंत्र्याची गाथा देणारं स्मृतीदालन, पूर्व उपनगरात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार, मुंबईच्या २४ तास पाणी पुरवठ्यासाठी गारगाई पिंजाळ धरणाचे काम, समुद्राचे पाणी गोडं करण्याचा प्रकल्प अशी आश्वासने २०१७ मधील वचननामामध्ये देण्यात आली होती. ठाकरेंनी २०१७ वचननाम्यातील मुद्दे पुन्हा कॉपीपेस्ट करुन इंग्रजी भाषेत सादर केले, असा टोला शेवाळे यांनी लगावला. शिवसेना मराठी माणूस, हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायला घाबरत नाही. निवडणूक आयोगाने कारवाई करावी, आम्ही घाबरत नाही, असे शेवाळे म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेकडून पंचवार्षिक कार्यक्रम घोषीत करणार आहोत. यासाठी पुरेसा निधी आणि धोरणात्मक निर्णय़ घेतले जाणार आहेत. मुंबईतील मराठी माणूस, मराठी उद्योजक, मराठी महिलांसाठी अर्थसहाय्य, मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांचे पुनर्वसन करण्यासाठी शिवसेना कार्यक्रम राबवणार आहे, असे शेवाळे म्हणाले.



ठाकरेंचा शब्द भ्रष्टाचाराचा, मतलाबाचा आणि तिजोरी लुटण्याचा


शेवाळे यांनी ‘हा शब्द ठाकरेंचा’ यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की काँग्रेससोबत जाणार नाही, हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही हा बाळासाहेबांचा शब्द होता. बाळासाहेबांचा शब्द हा धनुष्यबाणासारखा होता, एकदा सुटला की आरपार जायचा. मात्र ठाकरेंचा शब्द यूटर्न मारणारा असून तो त्यांच्यावरच उलटणार आहे, अशी टीका शेवाळे यांनी केली. एकमेकांना विश्वासघातकी म्हणणारे, पाठित खंजीर खुपसला म्हणणारे आणि आपलाच शब्द गिळणारे ते आहेत त्यामुळे मुंबईकर जनता ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही, असे शेवाळे म्हणाले. त्यांचा शब्द भ्रष्टाचाराचा, मतलाबाचा आणि तिजोरी लुटण्याचा आहे, अशी खरमरीत टीका शेवाळे यांनी केली. त्यामुळेच त्यांनी वचननाम्यातमध्ये जाणीवपूर्वक हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख टाळला.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत