शेकाप उमेदवार करुणा नाईक समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उबाठा पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील शेकाप उमेदवार करुणा नाईक यांच्यासह माजी सरपंच आणि अनेक पदाधिकार्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला, तर प्रभाग २ मधील ‘उबाठा’ पदाधिकार्यांनीही भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले.


या पक्षांतरामुळे पनवेलमध्ये भाजपची ताकद अधिक वाढली असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका प्रभाग क्रमांक ९ मधील शेकापच्या उमेदवार करुणा नाईक, आसुडगावचे माजी सरपंच नंदकुमार नाईक, माजी सरपंच विजय भोपी, माजी नगरसेवक सुनील नाईक यांंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे प्रभाग २ मधील शिवसेना उबाठाचे तळोजा उपविभागप्रमुख हरेश पाटील, तोंडरे उपशाखाप्रमुख वासुदेव पाटील, सुशांत नाईक, नरेंद्र नाईक, तेजस घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी पक्षात स्वागत केले. भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस तथा विनविरोध विजयी झालेले नगरसेवक नितीन पाटील, भाजप महायुतीचे प्रभाग क्रमांक ९चे उमेदवार शशिकांत शेळके, प्रतिभा भोईर, महादेव मधे; प्रभाग क्रमांक २ चे उमेदवार कृष्णा पाटील, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर, शंकुनाथ भोईर, सुरेश भोईर, महेश पाटील, अमर उलवेकर, निलेश भोईर, संज्योत शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या पक्षांतरामुळे शेकाप आणि शिवसेना उबाठाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज - राघव चड्ढा यांचा टोला

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सध्या अंतर्गत नाराजी आणि वादांच्या भोवऱ्यात अडकला असून, पक्षाने आत्मचिंतन

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी

Nitesh Rane : 'मराठीचा आग्रह धरताना हिंदूंमध्ये फूट पाडू नका'

सिंधुदुर्ग : 'प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमच्या परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेला