मुंबई वगळता इतर ठिकाणी रिपाइंचा महायुतीला पाठिंबा

मुंबई : भाजपने मुंबईत कोणत्याही जागा न सोडल्याने रिपाइंने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, भाजपशी मैत्रीपूर्ण लढती होतील असे सांगत अन्य सर्वत्र महायुतीला रिपाइंचा पाठिंबा असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घोषित केले. महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जेथे महायुतीचे एकत्रित उमेदवार आहेत तेथे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलेे. भाजप व शिंदे सेनेचे उमेदवार समोरासमोर उभ्या असलेल्या वाॅर्डांमधील रिपाइंची भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही. महायुतीत मुंबईत एकत्र जागावाटप झाले तरी रिपाइंला जागा मिळाल्या नाहीत. याबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. ती दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवले यांच्या स्वतंत्र बैठकाही घेतल्या. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नसल्याचे स्पष्ट होते आहे. मुंबईत दलित-मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. काँग्रेस-वंचित एकत्रपणे निवडणुकांना सामोरे जात आहेत, तर ठाकरे बंधूंनाही विशेषतः उबाठाना दलित मते मिळतील असे वाटते आहे. या तिहेरी लढतीत भाजपला रिपब्लिकन पक्षासाठी स्वतंत्रपणे जागा देणे उचित वाटले नसावे. तथापि, जागावाटप योग्यप्रकारे झाले नसले तरी आमची युती अभंग आहे. युतीत जिंकून येईल, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड