साखरेच्या उत्पादनात उत्तर प्रदेशच्या पुढे महाराष्ट्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साखरेच्या सीझनची जोरदार सुरुवात झाली. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रिज लिमिटेड अर्थात NFCSF च्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ मध्ये देशातील साखरेचे सरासरी वार्षिक उत्पादन २३.४३ टक्के वाढून ११.८३ मिलियन टन पोहोचले आहे. देशातील साखरेच्या उत्पादन वाढीमागे महाराष्ट्रातील साखर उत्पादनातील वाढ कारणीभूत ठरली आहे. NFCSF नुकतेच जारी केलेल्या निवेदनात सांगितले की ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देशातील सुमारे ४९९ साखर कारखान्यांनी गळीप हंगामात भाग घेतला. या दरम्यान १३४ मिलियन टन उसाचे गाळप झाले. ज्यामुळे ११.८ मिलियन टन साखरेचे उत्पादन झाले. या दरम्यान सरासरी साखरेची रिकव्हरी ८.८३ टक्के राहिली. देशात ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ दरम्यान उत्तर प्रदेशात साखर उत्पादन वाढून ३.५६ मिलियन टन झाले आहे. ही वाढ महाराष्ट्राच्या तुलनेत कमी राहिली. देशाचे दुसरे सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. या राज्यात साखरेचे उत्पादन ६३ टक्के वाढून ४.८७ मिलियन टन पोहचले. जे गेल्यावर्षी २.९९ मिलियन टन होते. ऊस उपलब्धता आणि साखर कारखान्याची निरंतर गाळप क्षमतेमुळे महाराष्ट्र या हंगामात ग्रोथ इंजिन बनला आहे.

Comments
Add Comment

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड