कडोंमपाच्या १०२ जागांसाठी ४९० उमेदवार रिंगणात

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर बिनविरोध निवडून आलेल्या २० जागांव्यतिरिक्त १०२ जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण ४९० उमेदवार शिल्लक राहिले असून, २०५ उमेदवारांनी आपली उमेदवारी माघार घेतली आहे.


त्यात निवडणुकीपूर्वीच महायुतीचे २० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. अशामध्ये आता उर्वरित १०२ प्रभागातही आपले उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसेना आणि भाजपचा प्रयत्न असणार आहे.


उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे १४ आणि शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये वकील, डॉक्टर, व्यावसायिक, उपहारगृह चालक, ठेकेदार, कंत्राटदार, वाहतूकदार व्यावसायिक, कल्याण डोंबिवलीत खाडी किनारे, पालिकेची आरक्षणे हडप करून बेकायदा चाळी आणि इमारती उभारणारे भूमाफिया, काही उच्चशिक्षित यांचा समावेश आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेत एकूण १२२ नगरसेवक आहेत. ३१ पॅनलमधून ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी नऊ निवडणूक अधिकारी कार्यरत आहेत. डोंबिवलीत एका उच्चशिक्षित वकील असलेल्या अभ्यासू माजी नगरसेवक आणि एक पक्षीय पदाधिकाऱ्याने अचानक युतीच्या उमेदवाराविरूद्ध माघार घेतल्याने कल्याण-डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरला आहे.


निवडणूक निर्णय अधिकारी एक यांच्या कार्यालयातून १३, निवडणूक अधिकारी दोन यांच्या कार्यालयातून २३, निवडणूक अधिकारी तीन यांच्या कार्यालयातून १४, निवडणूक अधिकारी चार यांच्या कार्यालयातून १९, ५ विभागातून ३२, सहा विभागातून १७, सात विभागातून २२, ८ विभागातून २८, निवडणूक निर्णय अधिकारी ९ विभागातून ३७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, अशी माहिती पालिका निवडणूक जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, लवकरच रितेशचा 'हा' आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी सिनेमाची चाहते अनेक दिवसांपासून वाटत पाहत आहेत. मात्र, आता त्यांच्यासाठी खुशबर

बादशाहनंतर आता 'या' प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक बादशाहला बिष्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु