उत्तर भारतीयांसाठी केलेला स्वतंत्र जाहीरनामा मागे घ्या अन्यथा जाहीर होळी !

मराठी अभ्यास केंद्राचा काँग्रेसला इशारा


मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्तरभारतीयांसाठी प्रसिद्ध केलेला स्वतंत्र जाहीरनामा तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी लोक त्याची होळी करतील, असा इशारा मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी दिला. मराठी अभ्यास केंद्राने तयार केलेला मराठीनामा शुक्रवारी मराठी पत्रकारसंघात आयोजित पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला. यावेळी आनंद भंडारे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुहास राणे तसेच संयुक्त महाराष्ट्र आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


डॉ. पवार म्हणाले की, स्वतःच्या राज्यात बकालीकरण, बेकारी, असुरक्षितता आणि जातीयतेमुळे परप्रांतीय महाराष्ट्रात स्थलांतर करतात. येथील नैसर्गिक, राजकीय, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्रोतांचा वापर करूनही मराठी भाषा शिकण्यास नकार देतात. त्यातच काँग्रेससारखे पक्ष उत्तरभारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा काढतात, ही मुजोरी सहन केली जाणार नाही. परप्रांतीयांनी आपल्या राज्यात जाऊन आपली मुजोरी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठीनाम्याच्या पाठिंब्यासाठी ऑनलाइन मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


मराठीनामा सर्व राजकीय पक्षांना देण्यात येणार असून, उत्तरभारतीय, गुजराती आणि मारवाडी समाजाचे लांगुलचालन करणारे मराठी नेते महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरत आहेत, असेही पवार यांनी सांगितले. “आज सुपात असलेले उद्या जात्यात जाणारच आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेत परप्रांतीयांचा प्रवेश झाल्यास ते मराठी लोकांचा बंदोबस्त करतील,” असा इशारा त्यांनी दिला.


मराठी शाळा बंद पडण्यासाठी परप्रांतीय जबाबदार नसून मराठी असूनही इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मुलांना शिकवणारे मराठी पालकच जबाबदार असल्याचे पवार यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

पुढील सहा महिन्यांत 'एफआयआर'पासून 'चार्जशीटपर्यंत'ची सर्व प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल

गडचिरोलीतील 'सी-६०' जवानांना विशेष पदक जाहीर मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाला तंत्रज्ञानाने अधिक सक्षम करण्यासाठी

अशोक खरातल्या भेटल्याच्या आरोपावर काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे ?

पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी असताना नीलम गोऱ्हे राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी अशोक खरातची भेट घेतली

रामदास आठवलेंनी रिपाईंच्या कार्यकर्त्यांना सुनावले खडे बोल

मुंबई : रिपब्लिकन पक्षाची देशभर घोडदौड सुरु आहे. नागालँन्ड सारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार निवडुन आले

Neelam Gorhe : मंत्रिपद मिळवण्यासाठी नीलम गोऱ्हे भोंदूबाबा खरातच्या चरणी!

- सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा खळबळजनक आरोप मुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाचे

Nitin Navin : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिला आपल्या आमदारकीचा राजीनामा

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन नवीन यांनी आज

Satara : साताऱ्याचे आयपीएस तुषार दोशी सक्तीच्या रजेवर

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीवेळी राजकीय पक्षांमध्ये संघर्ष झाला. अखेर निवडणूक भाजपने जिंकली.