उत्तर भारतीयांसाठी केलेला स्वतंत्र जाहीरनामा मागे घ्या अन्यथा जाहीर होळी !

मराठी अभ्यास केंद्राचा काँग्रेसला इशारा


मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्तरभारतीयांसाठी प्रसिद्ध केलेला स्वतंत्र जाहीरनामा तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी लोक त्याची होळी करतील, असा इशारा मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी दिला. मराठी अभ्यास केंद्राने तयार केलेला मराठीनामा शुक्रवारी मराठी पत्रकारसंघात आयोजित पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला. यावेळी आनंद भंडारे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुहास राणे तसेच संयुक्त महाराष्ट्र आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


डॉ. पवार म्हणाले की, स्वतःच्या राज्यात बकालीकरण, बेकारी, असुरक्षितता आणि जातीयतेमुळे परप्रांतीय महाराष्ट्रात स्थलांतर करतात. येथील नैसर्गिक, राजकीय, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्रोतांचा वापर करूनही मराठी भाषा शिकण्यास नकार देतात. त्यातच काँग्रेससारखे पक्ष उत्तरभारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा काढतात, ही मुजोरी सहन केली जाणार नाही. परप्रांतीयांनी आपल्या राज्यात जाऊन आपली मुजोरी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठीनाम्याच्या पाठिंब्यासाठी ऑनलाइन मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


मराठीनामा सर्व राजकीय पक्षांना देण्यात येणार असून, उत्तरभारतीय, गुजराती आणि मारवाडी समाजाचे लांगुलचालन करणारे मराठी नेते महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरत आहेत, असेही पवार यांनी सांगितले. “आज सुपात असलेले उद्या जात्यात जाणारच आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेत परप्रांतीयांचा प्रवेश झाल्यास ते मराठी लोकांचा बंदोबस्त करतील,” असा इशारा त्यांनी दिला.


मराठी शाळा बंद पडण्यासाठी परप्रांतीय जबाबदार नसून मराठी असूनही इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मुलांना शिकवणारे मराठी पालकच जबाबदार असल्याचे पवार यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर न्यायालयाची दखल; बजरंग दल प्रकरणी पोलिस तपास सुरू

मुंबई : काँग्रेसने २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात बजरंग दलवर बंदी घालण्याचं आश्वासन

मागील तीन महापालिका निवडणुकांच्या तुलनेत यंदा उमेदवारांची संख्या घटली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार

उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त; भेटीगाठी, देवदर्शन, प्रचार फेऱ्यांनी वातावरण निवडणूकमय

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या २२७ प्रभागांतील उमेदवारी अंतिम झाल्यानंतर पहिल्या रविवारी उमेदवारांनी

मुलुंड प्रभाग १०७ मध्ये राजकीय लढत

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंड पश्चिमेतील प्रभाग क्रमांक १०७

मनसे शिष्टमंडळाच्या भेटीनंतर निवडणूक आयुक्तांनी मागवला ‘बिनविरोध निवडी’चा अहवाल

उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल आयुक्तांकडे अविनाश जाधव यांनी सादर केले पुरावे मुंबई : राज्यातील १०

मुंबईत केवळ १० बंडखोरांनाच स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या बंडखोरीला आळा घालण्यासाठी सर्वपक्षीय