सुक्या मासळीची आवक वाढल्याने दर आटोक्यात

अलिबाग : रायगड जिल्हा ताज्या मासळीबरोबरच सुक्या मासळीसाठीही प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यात ठिकाठिकाणी सुक्या मासळीच्या बाजारपेठा नजरेत पडतात. या बाजारपेठांमध्ये लाखोंची उलाढाल होत असून, सध्या रायगड जिल्ह्यात सुक्या मासळीची आवक वाढल्याने सुक्या मासळीचे दरही आटोक्यात आहेत. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांकडून मोठ्याप्रमाणात सुक्या मासळीची खरेदी होत असल्याचे चित्र आहे.


महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई, कोकण आणि किनारपट्टीच्या भागात सुकी मासळी खूप लोकप्रिय आहे. दरदिवशी समुद्रात मिळालेली ताजी मासळी ही सगळीच विकली जात नाही. त्यामुळे ही मासळी सुकवून नंतर विकली जाते.


सध्या ओली मासळी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने अलिबाग, मुरड, उरण, श्रीवर्धन, नावगाव, वरसोली याठिकाणी मासळी सुकवली जाते. सध्या मासळी सुकविण्यासाठी, तर सायंकाळी सुकविलेली मासळी जमा करण्यासाठी कोळी महिलांची लगबग सुरु असते.


रायगड जिल्ह्यात ४ हजार ९९३ छोट्या-मोठ्या नौकांच्या माध्यमातून मासेमारी करण्यात येते. बाजारात ताजे मासे मुबलक आल्याने माशांना फारशी किंमत मिळत नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेले ताजे मासे फेकून फुकट घालविण्यापेक्षा हे मासे सुकविले जातात. बोंबिल, अंबाड, जवळा, कोळंबी, ढोमी आदी छोट्या मासे देखील सुकविले जातात.


प्रमुख बाजारपेठा : अलिबाग, श्रीवर्धन, उरण, नावगाव.


प्रमुख मासळी : बोंबिल, कोळंबी, जवळा, बांगडा.


परिस्थिती : आवक वाढल्याने दर आटोक्यात, पर्यटकांची पसंती.

Comments
Add Comment

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला माणगाव तालुक्यात ७ मार्चपासून सुरुवात

माणगाव : माणगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध प्रकारचे शासकीय दाखले व महसूल विषयक

अलिबाग नगरपालिकेचा १६१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

करवाढ नाही, विकासकामांना प्राधान्य : नगराध्यक्षा अक्षया नाईक अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन

जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणाची जुळवाजुळ

जिल्हाधिकारी कार्यालयात १२ मार्चला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया तालुकास्तरावर ११ मार्चला सभापती,

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना