अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी पहिल्यांदाच एकत्र, ‘ओह माय गॉड ३' मध्ये प्रमुख भूमिका

मुंबई: २०२६ मध्ये अभिनेता अक्षय कुमार विविध मोठ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जॉली एलएलबी’, ‘हाऊसफुल ५’ आणि ‘केसरी चॅप्टर ५’ या सिक्वेल चित्रपटांसह तो ‘वेलकम टू द जंगल’मधून प्रेक्षकांना हसवणार आहे. अक्षय कुमारच्या आणखी एका बहुप्रतिक्षित चित्रपटाची चर्चा सुरू झाली असून, तो पुन्हा एकदा लोकप्रिय फ्रँचायझीचा भाग होणार आहे.


अक्षय कुमार ‘ओह माय गॉड ३’ च्या तिसऱ्या भागात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून अभिनेत्री राणी मुखर्जी पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत रूपेरी पडद्यावर झळकणार असल्याची माहिती आहे. दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ‘ओह माय गॉड 3’च्या कथानकासाठी अमित राय यांनी पटकथा लिहिली असून, मागील दोन्ही भागांपेक्षा हा भाग अधिक भव्य, सध्याच्या घडामोडींशी संबंधित आणि प्रभावी असेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. पहिल्या दोन भागांच्या यशानंतर अक्षय कुमार पुन्हा या फ्रँचायझीचा भाग बनत आहे.


या तिसऱ्या भागात अक्षय कुमारसोबत राणी मुखर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार असल्याने चित्रपटाबाबतची चर्चा आणखी वाढली आहे. सध्या चित्रपटाचं प्री-प्रॉडक्शन सुरू असून, लवकरच शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


‘ओह माय गॉड’चा पहिला भाग २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात १४९.९० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या भागाने ६० कोटींच्या बजेटमध्ये २२१.५७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आता तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.

ग्रामीण मनोरंजनासाठी ‘किस्सा शुरू टॉकीज’!

ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने नवीन चित्रपट पाहण्यासाठी

Deepa Sawant-Khot : मर्डर मिस्ट्रीची ‘तलास’

कलेची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यातून मार्ग काढून त्या कलेची

Usha Nadkarn : स्पष्ट बोलण्यास कारण की...

स्पष्टवक्तेपणा या स्वभावामुळे मराठी कलाक्षेत्रात ज्या दोन व्यक्तींना प्रामुख्याने ओळखले जाते; त्या वक्ती

Pedii Box Office Collection : पेड्डीचा बॉक्स ऑफिसवर धडाका! 2 दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) यांचा बहुचर्चित 'पेड्डी' (Peddi) चित्रपट बॉक्स