वसई-विरार पालिका निवडणुकीत ५४७ उमेदवार रिंगणात

विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत २८६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे एकूण ५४७ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली असून, काही प्रमाणात उमेदवारांची मनधरणी करण्यातही राजकीय पक्षांना यश आले आहे.


वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी विविध राजकीय पक्षाच्या व अपक्ष अशा ९३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील ६४ अर्ज छाननी दरम्यान बाद झाले होते. तर ८३३ अर्ज वैध ठरविण्यात आले होते.


शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यादिवशी २८६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ५४७ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.


प्रभागनिहाय     उमेदवार   संख्या




  1. प्रभाग               माघार      कायम

  2. ए                        १८         ४०

  3. बी                       १५        ७८

  4. सी                      ५०        ५९

  5. डी                      १५         ६८

  6. ई                        ३९         ५०

  7. एफ                    ४२         ७४

  8. जी                      ४२         ६६

  9. एच                     ३७         ५४

  10. आय                  २८           ५८

Comments
Add Comment

RSS Chief Mohan Bhagwat : मोहन भागवत अमेरिकेत दाखल; न्यूयॉर्कमध्ये ५ हजार जणांच्या मेळाव्याला करणार संबोधन

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत मंगळवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात दाखल झाले.

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Navnath Ban : आदिवासी शाळांच्या अनुदानावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान आणि शाळांमधील कथित गैरप्रकारांवरून महाराष्ट्रातील

BJP Vs Congress : राहुल गांधींच्या पत्रावर भाजपचा पलटवार

- आदिवासी शाळांमधील गैरकारभारासाठी काँग्रेस नेतेच जबाबदार; राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मुद्यावर राजकारण

Sharad Pawar : शरद पवारांनी बोलावली कार्यकारिणीची तातडीची बैठक

- दोन्ही राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; २९ ऑगस्टच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबई : पार्थ पवार आणि शरद

Maharashtra Cabinet Decisions : नागपूरमध्ये लता मंगशेकर विद्यापीठ, खेळाडूंच्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा यांसह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे