वसई-विरार पालिका निवडणुकीत ५४७ उमेदवार रिंगणात

विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत २८६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे एकूण ५४७ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली असून, काही प्रमाणात उमेदवारांची मनधरणी करण्यातही राजकीय पक्षांना यश आले आहे.


वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी विविध राजकीय पक्षाच्या व अपक्ष अशा ९३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील ६४ अर्ज छाननी दरम्यान बाद झाले होते. तर ८३३ अर्ज वैध ठरविण्यात आले होते.


शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यादिवशी २८६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ५४७ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.


प्रभागनिहाय     उमेदवार   संख्या




  1. प्रभाग               माघार      कायम

  2. ए                        १८         ४०

  3. बी                       १५        ७८

  4. सी                      ५०        ५९

  5. डी                      १५         ६८

  6. ई                        ३९         ५०

  7. एफ                    ४२         ७४

  8. जी                      ४२         ६६

  9. एच                     ३७         ५४

  10. आय                  २८           ५८

Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Eknath Shinde : 'ज्ञानाचा महासागर हरपला'; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंतिम

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई