सातारच्या ऐतिहासिक भूमीत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ

ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपरिक आठवणी


सातारा : सातारच्या ऐतिहासिक नगरीत साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ येथे ध्वजारोहणाच्या मंगल सोहळ्याने या साहित्यकुंभाचा शुभारंभ झाला. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा-शाहूपुरी (सातार) आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे १ ते ४ जानेवारी दरम्यान या साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. साहित्याच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या विविध कट्ट्यांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कवी कट्टयाचे उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते व रवींद्र बेडकीहाळ यांच्या उपस्थितीत तर गझल कट्टयाचे उद्घाटन समंलनाचे स्वागत अध्यक्ष भोसले यांच्या हस्ते झाले. प्रकाशन कट्टयाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष श्रीमंत भोसले म्हणाले,“साहित्यातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्वागतासाठी सातारकर सज्ज आहेत. स्वागताची कोणतीही उणीव भासू नये, यासाठी प्रशासन आणि आम्ही सर्वजण मनोभावे प्रयत्न करत आहोत. हे संमेलन सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरेल.


यावेळी संमेलनाचे अध्यक्ष पाटील म्हणाले, या संमेलनासाठी सातारकरांमध्ये मोठा उत्साह आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्य आणि रसीक मंडळी आलेली आहेत. त्यांचा उत्साह पाहून आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. साहित्यशारदेच्या या उत्सवात सातारा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील, संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यिक, रसिक सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीने महाराष्ट्र राज्याची संस्कृती परंपरा संत वाङ्ममय आणि साहित्य यांच्या आठवणी निश्चितपणे जागवल्या. राजवाडा येथून ग्रंथ दिंडीची सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीमध्ये ५५ शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पर्यावरण, साताऱ्यातील पर्यटन, संत साहित्य, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व थोर समाज सुधारक महात्मा फुले यांची शिक्षण चळवळ, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांनी केलेला संतपरंपरेचा प्रसार अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी चित्र सादर केले.

Comments
Add Comment

अखेरच्या सत्राचे विश्लेषण: बँक निर्देशांकांमुळे शेअर बाजारात उसळी, जलवा का लार्जकॅपसाठी वातावरण निर्मिती? निफ्टी सर्वोच्च पातळीवर वाचा उद्याची निफ्टी स्ट्रेटेजी

मोहित सोमण: आज बीएसई व एनएसईवर बँक निर्देशांकाने रॅली दर्शविल्यानंतर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज वाढी

कोणतीही चूक, निष्काळजीपणा किंवा नियमभंग सहन करणार नाही महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आचारसंहितेच्‍या कालावधीत प्रत्येक कृतीची नियमांनुसार अचूक व वेळेत नोंद घेणे बंधनकारक

५० जणांना घेऊन जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात भीषण अपघात, कारलाही उडवलं, पोलीस घटनास्थळी

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या ताम्हिणी घाटात शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. सुमारे

RBI Update: आतापर्यंत २००० रुपयांच्या ९८.३९% नोटा जमा, मुदत संपली तरी तुम्ही नोटा जमा करू शकाल? वाचा

मोहित सोमण:आतापर्यंत आरबीआयने ९८.३९% दोन हजारांच्या नोटा जमा झाल्याचे स्पष्ट केले आहे. मे १९,२०२३ पर्यंतचा हा

अर्ज मागे घेण्यासाठी कोणावरही दबाव आणला नाही - राहुल नार्वेकर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेदरम्यान कुलाबा मतदारसंघात विरोधी उमेदवारांना

महाराष्ट्रासह शेअर गुंतवणूकदार वारंवार फसतात याचे मूर्तीमंत उदाहरण! गुजरात राजस्थान येथे ईडीच्या धाडी

मोहित सोमण: दोन स्वतंत्र प्रकरणात गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने घोटाळ्याप्रकरणी आरोपींच्या