कल्याण: महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी संपली आहे. आता अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने खातं उघडून दमदार सुरुवात केली आहे. कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचे अर्थात भाजपचे बिनविरोध हॅट्रीक केली होती. आज भाजपचे आणखी दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये रविंद्र चव्हाण यांच्या विजयाची घोडदौड सुरू असल्याचे बोलले जात आहे.
पॅनल क्रमांक २६ (क) मधून आसावरी केदार नवरे, पॅनल क्रमांक १८ (अ) मधून रेखा चौधरी, पॅनल क्रमांक २६ बी मधून रंजना मितेश पेणकर या तीन उमेदवारांच्या विजयामुळे डोंबिवलीमध्ये काल विजयाची हॅट्रीक झाली. आजही दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचे पारडे जड झाले आहे. कल्याण डोंबिवलीच्या पॅनल २७ (अ) मधून मंदा सुभाष पाटील आणि क्रमांक २४ (ब) मधून ज्योती पवन पाटील यांचा बिनविरोध विजय झाला आहे.
आरबीआय फायनांशियल स्टॅबिलिटी रिपोर्ट- मोहित सोमण: बँकेच्या असेट क्वालिटीत चांगली सुधारणा झाल्याचे आरबीआयच्या नव्या फायनांशियल स्टॅबिलिटी ...
कल्याण-डोंबिवलीत यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. मात्र समीकरणे बदलली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महायुती म्हणून शिवसेना ६६ आणि भाजप ५६ जागांवर लढत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस ४२ जागांवर स्वबळावर लढत आहे. मनसे आणि उबाठाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे ५४ तर उबाठा ६८ जागांवर निवडणूक लढवत आहे. यासर्व जागांपैकी ५ जागांवर आतापर्यंत भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे.






