मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री, अधिकारीच गैरहजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाराजी व्यक्त


मंत्रालयात शुकशुकाट


बैठकीला जेमतेम १४-१५ मंत्रीच हजर


मुंबई : ऐन महापालिका निवडणुकीच्या धावपळीत आणि वर्ष अखेरच्या दिवशी, बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पण, या बैठकीला खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी दांडी मारली. शिवाय अनेक अधिकारी वर्षअखेरचा मुहूर्त साधून पर्यटनासाठी गेल्यामुळे बहुतांश अधिकाऱ्यांनीही दांडी मारली होती. सर्व दांडीबाहद्दर अधिकारी सुट्टीवर दिसतात, असे म्हणत कमी उपस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.


राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांची धावपळ उडाली होती. कॅबिनेट मंत्र्यांसह, राज्यमंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधींना पक्षाचे एबी फॉर्म दिलेल्यांना अर्ज भरण्यासाठी वेळेत कार्यालयात पाठविण्यासाठी, उमेदवारी नाकारलेल्यांची समजूत काढण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली. नाराजांच्या रोषाला सामोर जाण्याचे प्रकार तर अनेक ठिकाणी घडले.


बुधवारी झालेल्या बैठकीकडे महापालिकांच्या धापवळीत असलेल्या कॅबिनेट बैठकीकडे पाठ फिरवली. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बैठकीला नव्हते.


राजकीय नेते, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींची मंत्रालयाकडे पाठ


मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात राज्यभरातील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींची गर्दी असते. पण, महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राजकीय नेते, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी व्यस्त असल्यामुळे त्यांनीही मुंबईकडे पाठ फिरवली. बैठकीनंतर गाठीभेठी घेण्यासाठी चढाओढ असते. पण, बुधवारी मंत्रालयात शुकशुकाट होता.


Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर