रामदास आठवले यांचे बंड २४ तासांत झाले थंड - मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; भाजप-शिवसेना कोट्यातून १२ जागा मिळणार असल्याचा दावा

मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या जागावाटपात सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत महायुतीला धक्का देणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे बंड अवघ्या २४ तासांत थंड झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आठवले यांनी माघार घेतली असून, भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) किमान १२ जागा सोडण्याचे ठरल्याचा दावा त्यांनी केला.


मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी वर्षा निवासस्थानाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, आरपीआयने महायुतीकडे १७ जागांची अंतिम यादी सादर केली. त्यापैकी भाजपच्या कोट्यातील ६-७ आणि शिवसेनेच्या कोट्यातील ६-७ अशा एकूण १२ जागा सोडण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी संमती दिली आहे. याबाबत फडणवीस यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांना निर्देश दिले आहेत. शिवसेना कोट्यातील उर्वरित जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार आहे.


या १२ जागांवर आरपीआयचे उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून लढतील आणि तेथील भाजप-शिवसेना उमेदवार माघार घेतील. उर्वरित १८ जागांवर (आरपीआयच्या ३० पैकी) स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत होईल. मुंबईच्या एकूण २२७ जागांपैकी उर्वरित १९७ जागांवर आरपीआय महायुतीचा घटकपक्ष म्हणून प्रचार करेल आणि महायुती उमेदवारांना पाठिंबा देईल, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राज्यभर चर्चेत असलेला स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्यावर

इराणचा कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला

बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात

हुथी-हिजबुल्लाहच्या प्रवेशाने जगावर अणुयुद्धाचे संकट

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.