रामदास आठवले यांचे बंड २४ तासांत झाले थंड - मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; भाजप-शिवसेना कोट्यातून १२ जागा मिळणार असल्याचा दावा

मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या जागावाटपात सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत महायुतीला धक्का देणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे बंड अवघ्या २४ तासांत थंड झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आठवले यांनी माघार घेतली असून, भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) किमान १२ जागा सोडण्याचे ठरल्याचा दावा त्यांनी केला.


मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी वर्षा निवासस्थानाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, आरपीआयने महायुतीकडे १७ जागांची अंतिम यादी सादर केली. त्यापैकी भाजपच्या कोट्यातील ६-७ आणि शिवसेनेच्या कोट्यातील ६-७ अशा एकूण १२ जागा सोडण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी संमती दिली आहे. याबाबत फडणवीस यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांना निर्देश दिले आहेत. शिवसेना कोट्यातील उर्वरित जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार आहे.


या १२ जागांवर आरपीआयचे उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून लढतील आणि तेथील भाजप-शिवसेना उमेदवार माघार घेतील. उर्वरित १८ जागांवर (आरपीआयच्या ३० पैकी) स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत होईल. मुंबईच्या एकूण २२७ जागांपैकी उर्वरित १९७ जागांवर आरपीआय महायुतीचा घटकपक्ष म्हणून प्रचार करेल आणि महायुती उमेदवारांना पाठिंबा देईल, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

Comments
Add Comment

वीस वर्षांची सवय ठरली घातक; रोजच्या कॉफीतून शरीरात साचलं विष, अखेर ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

तैवान : तैवानमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आलं असून, रोजच्या वापरातील एका

नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील रामनगर परिसरात घडलेला तरुणाचा संशयास्पद मृत्यूचा अखेर उलघडा झाला. पोलिस तपासात समोर

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी