Thursday, January 1, 2026

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. सांडपाणी मिसळलेले पाणी प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भागीरथपुरा परिसरात पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीत सांडपाणी मिसळल्यामुळे चार नागरिकांचा मृत्यू झाला असून १४९ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.

जलवाहिनीत गळती झाली. गळतीमुळे शौचालयाचे सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकत्र झाल्यामुळे मोठे संकट निर्माण झाले. या प्रकरणी इंदूरचे आयुक्त आणि महापौर यांनी चौकशीचे आदेश दिले

नव्या जलवाहिनीला मंजुरी दिली असूनही कामाने अपेक्षेप्रमाणे गती घेतलेली नाही. आता सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकमेकांत मिसळण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे राजकीय पडसाद उमटले आहेत. काँग्रेसने याला प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा ठरवत महापौर आणि आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment