‘जर्मन बेकरी’प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदार याचा गोळीबारात मृत्यू

श्रीरामपूर : पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण श्रीरामपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. दुपारी सुमारे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली असून, शहरातील कॉलेज रोड परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागिरदारवर गोळीबार केला. या हल्ल्यात बंटी जहागिरदार गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.


बंटी जहागिरदार कॉलेज रोडने दुचाकीवरून जात असताना अचानक दोन अज्ञात इसमांनी जवळ येत त्याच्यावर गोळीबार केला. काही सेकंदातच हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अनेक दुकाने तातडीने बंद करण्यात आली. अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार हे नाव २०१० साली पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात चर्चेत आले होते. या प्रकरणातील तो प्रमुख आरोपींपैकी एक होता. दीर्घ काळ तुरुंगवासानंतर त्याला २०२३ मध्ये जामीन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो श्रीरामपूर परिसरात राहत असल्याची माहिती आहे.


या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला केवळ वैयक्तिक वादातून झाला की यामागे काही मोठा कट आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली. तसेच, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी काही समर्थक व नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत, शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त वाढविण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी विशेष पथके तयार करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोर कोण होते, त्यांनी कोणत्या दिशेने पलायन केले, तसेच हल्ल्यामागील नेमके कारण काय याचा सखोल तपास सुरू आहे. वैयक्तिक वैर, जुना वाद की गुन्हेगारी पार्श्वभूमी यापैकी कोणता धागा पुढे येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

Comments
Add Comment

बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत

IPL 2026 RR vs PBSK : राजस्थान रॉयल्स 6 विकेट्सने विजयी, पंजाबचा पहिलाच पराभव

चंदीगड : यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, त्यानंतर डोनोव्हान फरेरा आणि प्रभावी खेळाडू शुभम दुबे यांच्यातील शानदार

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७

BMC News : मुंबईतील नालेसफाईचे काम सुमारे ३९ टक्के

यंदा मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्याचे प्रमाण होणार कमी दादर, माटुंगा रोड येथीलही तुंबई होणार कमी मुंबई