नवी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाची एकमेकांसोबत लढतीची शक्यता

उमेदवारी अर्जांचा भरणा


नवी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र ठरलेल्या नवी मुंबईत महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिंदेसेना एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र तयारी सुरू असल्याने युती तुटण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी नवी मुंबईत तब्बल तीन तास तळ ठोकत वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी युती व उमेदवार निवडीबाबत चर्चा केली. मात्र, याचवेळी भाजपने वाशी आणि सीवूड्स भागात शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांविरोधात सक्षम उमेदवार उभे करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस येथील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देत थेट रणशिंग फुंकण्यात आले.


ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ आदी उपनगरांमध्ये भाजप तसेच काही ठिकाणी शिंदेसेनेच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई आणि ठाण्यात भाजप–शिंदेसेना युतीचे सकारात्मक चित्र असताना नवी मुंबईतही युती व्हावी, यासाठी शिंदेसेनेकडून दबाव होता. मात्र नवी मुंबई हा आपला बालेकिल्ला असल्याने येथे कोणत्याही परिस्थितीत युती नको, अशी ठाम भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली होती. महापालिकेवर स्वबळावर सत्ता आणण्याची क्षमता असल्याचा दावा त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मांडला होता.


दुसरीकडे, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांमध्ये युतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. मात्र युतीच्या चर्चा पुढे सरकत असतानाच नवी मुंबईत भाप आणि शिंदेसेनेतील विसंवाद वाढत गेला.


समन्वय समितीच्या बैठकीत भाजपकडून शिंदेसेनेला अवघ्या २० जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याने तणाव आणखी वाढला. त्यानंतर युती तुटण्याचे संकेत स्पष्ट झाले होते. अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीस काही तास शिल्लक असतानाच त्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याच्या दिशेने घडामोडी वेगाने सुरू झाल्या. भाजपने १११ प्रभागांमध्ये उमेदवारांची अंतिम यादी तयार केल्याचे सांगितले जात असून, शिंदेसेनेनेही सर्व प्रभागांतील उमेदवारांची यादी सज्ज ठेवल्याचे समजते.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह कायम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; 'पैशांपेक्षा प्रेमाने माणसे जिंकता येतात' म्हणत सुप्रिया सुळेंना टोला मुंबई : नवी

Sunetra Pawar : बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा...

मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश मुंबई:-

Mantri Nitesh Rane : 'देवभाऊ'च कोकणच्या चित्रपटाचे डायरेक्टर!

मंत्री नितेश राणे; 'त्यांनी दिलेल्या जबाबदारीची मी केवळ अंमलबजावणी केली' मुंबई : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

MVA : विधान परिषद निवडणुक; अर्ज माघारीवरून 'मविआ'त फूट

घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांना संख्याबळाचा विसर; पुणे काँग्रेसकडून आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव मुंबई :

Maratha students : मराठा विद्यार्थ्यांना आता 'ओबीसी'प्रमाणेच शैक्षणिक सवलती

राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'महाडीबीटी' पोर्टलवर होणार तांत्रिक बदल, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच

Karnataka : कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह वाढला, नव्या सरकारच्या स्थापनेनंतर काही तासांतच मंत्र्याचा राजीनामा

बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातील एका