कडोंमपा निवडणुकीत जागावाटपाचे गुपित उघड होईना

जागावाटपाची अधिकृत घोषणा नाही


कल्याण : उद्या (ता.३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. काहींना महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून एबी फार्म देण्यात आले आहेत; परंतु जागावाटपाची अधिकृत घोषणा करायला आजही मुहूर्त मिळालेला नाही यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. जागावाटपाचे गुपित उघड होत नसल्याने युतीमधील ताण तणाव वाढत चालला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मुंबई महापालिकेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेची ओळख आहे. दरम्यान काळात निवडणुकीची तारीख जाहीर होताच सभांना सुरुवात झाली. मेळावे आणि सभांमध्ये घोषणाबाजी आणि भाषणाना उधाण आले होते. नगरसेवक पदांसाठी इच्छुक असलेले हौशे-नौशे जागावाटपच्या अधिकृत घोषणेकडे डोळे लाऊन बसले आहेत. मंगळवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अजुनही अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नाही.


तर कल्याण पूर्वेत भाजपने ९ जागांसाठी आणि शिवसेना (शिंदे गट) १६ उमेदवारी जाहीर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे काही उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर काही इच्छुकांना उमेदवारी अर्ज न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. असे असले तरी अजून कल्याण पश्चिम आणि डोंबिवलीचे चित्र अस्पष्टच आहे. महायुतीने जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने एक समिती स्थापन केली होती. मात्र भाजप कडून ८३ जागांची मागणी करण्यात आली. भाजपच्या वाट्याला ५८ तर शिवसेना (शिंदे गट) ६४ जागांवर लढेल, असे ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारीची अधिकृत घोषणा होत नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर

- १२ मे रोजी मतदान; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ एकच जागा पडणार मुंबई : विधानसभा निवडणुकीतील

Raghav Chadha : राघव चड्ढांना दुहेरी धक्का! पक्षाने पदावरून हटवल्यानंतर आता सुरक्षा देखील काढून घेतली

पंजाब सरकारने आम आदमी पक्षाचे माजी खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांची सुरक्षा काढून घेतली आहे. आम आदमी पक्षाने

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी! ९ जागांसाठी चुरस

- जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक

Nari Shakti Vandan Adhiniyam : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक भारताचे भविष्य बदलेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; महिला खासदारांची संख्या ४० टक्के पार होणार मुंबई : मोदी सरकारने

Nari Shakti Vandan : महिला आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन एकमत’

सर्वपक्षीय खासदारांना धाडले पत्र; ‘नारी शक्ती वंदन कायद्या’च्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे

Navnath Ban PC : संजय राऊत उबाठा हायजॅक करणार, नवनाथ बन यांचा गौप्यस्फोट

मुंबई : उबाठा गटात आता आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत ही थेट लढत पहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष