कडोंमपा निवडणुकीत जागावाटपाचे गुपित उघड होईना

जागावाटपाची अधिकृत घोषणा नाही


कल्याण : उद्या (ता.३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. काहींना महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून एबी फार्म देण्यात आले आहेत; परंतु जागावाटपाची अधिकृत घोषणा करायला आजही मुहूर्त मिळालेला नाही यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. जागावाटपाचे गुपित उघड होत नसल्याने युतीमधील ताण तणाव वाढत चालला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मुंबई महापालिकेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेची ओळख आहे. दरम्यान काळात निवडणुकीची तारीख जाहीर होताच सभांना सुरुवात झाली. मेळावे आणि सभांमध्ये घोषणाबाजी आणि भाषणाना उधाण आले होते. नगरसेवक पदांसाठी इच्छुक असलेले हौशे-नौशे जागावाटपच्या अधिकृत घोषणेकडे डोळे लाऊन बसले आहेत. मंगळवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अजुनही अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नाही.


तर कल्याण पूर्वेत भाजपने ९ जागांसाठी आणि शिवसेना (शिंदे गट) १६ उमेदवारी जाहीर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे काही उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर काही इच्छुकांना उमेदवारी अर्ज न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. असे असले तरी अजून कल्याण पश्चिम आणि डोंबिवलीचे चित्र अस्पष्टच आहे. महायुतीने जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने एक समिती स्थापन केली होती. मात्र भाजप कडून ८३ जागांची मागणी करण्यात आली. भाजपच्या वाट्याला ५८ तर शिवसेना (शिंदे गट) ६४ जागांवर लढेल, असे ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारीची अधिकृत घोषणा होत नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम आहे.

Comments
Add Comment

Minister Nitesh Rane : जयगड (रत्नागिरी) बंदराच्या निर्यात प्रकल्पाला गती द्या...

कोकणातील हापूस, काजू, मत्स्य निर्यातीसाठी सुविधा सक्षम करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश कोकणातील

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

रिक्त जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक; छगन भुजबळ केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना वेग मुंबई : राज्याच्या

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार उसळला; निवडणूक आयोगाचा कडक इशारा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या

Thalapathy Vijay : थलपती विजय ‘किंगमेकर’च्या शोधात!

चेन्नई : थलपती विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने तमिळनाडूमध्ये इतिहास रचला. द्रविडी

Manoj Tiwary : मनोज तिवारी यांचा तृणमूल काँग्रेसला रामराम

पश्चिम बंगाल : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे नेते मनोज तिवारी यांनी मंगळवारी पक्षाला रामराम

Mamata Banerjee : हा पराभव नाही, तर लोकशाहीचा... पराभवानंतर ममता दीदींचा आक्रमक पवित्रा; राजीनामा देण्यास ठाम नकार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तृणमूल