ठाण्यात महाविकास आघाडी फुटली!

काँग्रेसचा स्वबळाचा नारा


ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून समाधान न झाल्याने काँग्रेस पक्षाने आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर आहे. निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस आणि मनसे यांच्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र जागावाटपावरून मतभेद वाढले.


काँग्रेसने ३५ जागांची मागणी केली होती. मात्र, आघाडीतील इतर पक्ष काँग्रेसला केवळ पाच ते सहा जागा देण्यास तयार होते. हा प्रस्ताव अमान्य करत ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आघाडीतून बाहेर पडण्याची आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
चव्हाण म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले. मात्र, ज्यावेळी आम्ही आघाडीसोबत उभे होतो, तेव्हा आज जवळचे मानले जाणारे काही पक्ष विरोधकांसोबत होते. आता काँग्रेसकडे सर्व प्रभागांसाठी सक्षम उमेदवार असून, सर्व जागांवर उमेदवार उभे केले जातील.” वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.


दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, “विक्रांत चव्हाण यांनी नेमकी काय घोषणा केली याची माहिती घेतली जाईल. काही गैरसमज असतील तर आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू,” असे सांगितले.


काँग्रेसच्या या निर्णयामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट ढासळली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे राहणार की आघाडीतील फूट त्यांना फायदेशीर ठरणार, हे काळकच ठरवेल.

Comments
Add Comment

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज - राघव चड्ढा यांचा टोला

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सध्या अंतर्गत नाराजी आणि वादांच्या भोवऱ्यात अडकला असून, पक्षाने आत्मचिंतन

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी

Nitesh Rane : 'मराठीचा आग्रह धरताना हिंदूंमध्ये फूट पाडू नका'

सिंधुदुर्ग : 'प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमच्या परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेला