Snehal Jadhav : मुंबईत 'मनसे'ला मोठा धक्का; स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे ईशान्य मुंबईत शिवसेनेची ताकद अधिक वाढली असल्याचे मानले जात आहे.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'नंदनवन' येथे हा सोहळा पार पडला. यावेळी सुधीर जाधव आणि स्नेहल जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत भगवा हाती धरला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. मनसेचे अनेक पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्नेहल जाधव यांनी यापूर्वी नगरसेविका म्हणून केलेल्या कामाचा अनुभव आणि सुधीर जाधव यांची जनसंपर्क कौशल्याचा फायदा आता शिवसेनेला मुंबईत, विशेषतः त्यांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे.


यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “तळागाळातील जनतेसाठी काम करणारे नेतृत्व शिवसेनेत येत आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला निश्चितच फायदा होईल,” असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच भावी राजकीय वाटचालीसाठी त्यांनी जाधव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.


स्नेहल जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शिवसेनेची सर्वसामान्य जनतेशी असलेली बांधिलकी, विकासाभिमुख धोरणे आणि नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळेच आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. “जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी शिवसेनेत मिळेल,” असे त्या म्हणाल्या. सुधीर जाधव यांनीही पक्ष संघटनेत सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.


जाधव प्रवेशानंतर बोलताना जाधव दाम्पत्याने सांगितले की, "मुंबईतील रखडलेले प्रकल्प आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या गतीने काम करत आहेत, त्या विकासकामांना साथ देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे." या पक्षप्रवेशामुळे मनसेला मुंबईत गळती लागली असून, आगामी निवडणुकीत याचे काय परिणाम होतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

पश्चिम रेल्वेचे प्रवासी-केंद्रित विकासाचे ऐतिहासिक वर्ष

२०२५ मुंबई : २०२५ हे वर्ष पश्चिम रेल्वेसाठी एक ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी वर्ष म्हणून उदयास आले. हे वर्ष

राष्ट्रपतींचा 'आयएनएस वाघशीर'मधून प्रवास

मुंबई : भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी अरबी

पश्चिम रेल्वेवर आजपासून विविध मार्गांवर रेल्वे ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी १८ जानेवारी २०२६

आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी

कांदिवली - बोरिवली सहाव्या मार्गामुळे २२ नवीन लोकल फेऱ्या

मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी लोकल आणि एक्सप्रेस ट्रेन सेवा