गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले आहे की, कसोटी संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणशी संपर्क साधल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार आहेत, बोर्डाने कसोटी संघाच्या नेतृत्त्व गटात बदल करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सैकिया यांनी सांगितले की, ही बातमी पूर्णपणे तथ्यहीन आहे. काही प्रतिष्ठित माध्यम संस्था देखील ही बातमी चालवत आहेत, परंतु यात कोणतेही सत्य नाही. बीसीसीआय याचे थेट खंडन करते. अलीकडच्या काळात अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, कसोटी संघाच्या खराब कामगिरीनंतर व्हीव्हीएस लक्ष्मणला पुढील कसोटी प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. भारताला मायदेशात दक्षिण आफ्रिकेकडून २-० ने कसोटी मालिका गमवावी लागल्यानंतर या अटकळी समोर आल्या. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धही संघाला ०-३ ने पराभवाला सामोरे जावे लागले होते.


टेस्ट क्रिकेटमधील अलीकडील अपयशाच्या विपरीत, मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी मजबूत राहिली आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप टी-२० एकही सामना न हरता जिंकले. मात्र, त्यांच्या कार्यकाळात भारताने टेस्टमध्ये ७ सामने जिंकले, १० हरले आणि २ ड्रॉ खेळले आहेत. सध्या भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान कसोटी नाही, तर टी-२० विश्वचषक आहे. संघ आपल्या विजेतेपदाचे रक्षण करेल. यावेळी संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या हातात असेल. स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि भारत आपला पहिला सामना त्याच दिवशी मुंबईत अमेरिकेविरुद्ध खेळेल.

Comments
Add Comment

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने

युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ आणि त्यापूर्वी होणाऱ्या दक्षिण