रामदास आठवले यांची मुंबईत १४ ते १५ जागांची मागणी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या पक्षासाठी १४ ते १५ जागांची मागणी केली आहे. रिपाइंचे संख्याबळ कमी असले, तरी ज्यांच्या सोबत आरपीआय असतो, त्यांचेच सरकार सत्तेत येते, असा दावा करत त्यांनी महायुतीकडून सन्मानजनक जागा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली. माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, "आरपीआय पूर्वी काँग्रेससोबत होता तेव्हा काँग्रेसचे सरकार आले. नंतर शिवसेनेसोबत गेल्याने युतीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्याच पाहिजेत." तसेच, मुंबईतील राजकीय स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, मुंबईत ४० टक्के मराठी आणि ६० टक्के परप्रांतीय मतदार आहेत. मराठी मतदारांमध्येही महायुतीला मतदान करणारे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे मनसेसोबतची युती उबाठा गटाला फळणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राज्यभर चर्चेत असलेला स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्यावर

इराणचा कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला

बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात

हुथी-हिजबुल्लाहच्या प्रवेशाने जगावर अणुयुद्धाचे संकट

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.