रामदास आठवले यांची मुंबईत १४ ते १५ जागांची मागणी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या पक्षासाठी १४ ते १५ जागांची मागणी केली आहे. रिपाइंचे संख्याबळ कमी असले, तरी ज्यांच्या सोबत आरपीआय असतो, त्यांचेच सरकार सत्तेत येते, असा दावा करत त्यांनी महायुतीकडून सन्मानजनक जागा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली. माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, "आरपीआय पूर्वी काँग्रेससोबत होता तेव्हा काँग्रेसचे सरकार आले. नंतर शिवसेनेसोबत गेल्याने युतीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्याच पाहिजेत." तसेच, मुंबईतील राजकीय स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, मुंबईत ४० टक्के मराठी आणि ६० टक्के परप्रांतीय मतदार आहेत. मराठी मतदारांमध्येही महायुतीला मतदान करणारे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे मनसेसोबतची युती उबाठा गटाला फळणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व

दोन्ही ठाकरेंपेक्षा एकट्या भाजपला अधिक जागा मुंबई - मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या एकुण जागांपेक्षा एकट्या भाजपाला

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी प्रभाग १ - रेखा राम यादव, शिवसेना प्रभाग २ - तेजस्वी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७