रामदास आठवले यांची मुंबईत १४ ते १५ जागांची मागणी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या पक्षासाठी १४ ते १५ जागांची मागणी केली आहे. रिपाइंचे संख्याबळ कमी असले, तरी ज्यांच्या सोबत आरपीआय असतो, त्यांचेच सरकार सत्तेत येते, असा दावा करत त्यांनी महायुतीकडून सन्मानजनक जागा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली. माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, "आरपीआय पूर्वी काँग्रेससोबत होता तेव्हा काँग्रेसचे सरकार आले. नंतर शिवसेनेसोबत गेल्याने युतीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्याच पाहिजेत." तसेच, मुंबईतील राजकीय स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, मुंबईत ४० टक्के मराठी आणि ६० टक्के परप्रांतीय मतदार आहेत. मराठी मतदारांमध्येही महायुतीला मतदान करणारे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे मनसेसोबतची युती उबाठा गटाला फळणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
Comments
Add Comment

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन - मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आंदोलनात सहभाग; मनमानी चालू देणार नाही पुल होणारच

मुंबई : चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात

गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील संघर्ष पुन्हा उफाळला - मनोमिलन ठरले औटघटकेचे; नवी मुंबईकरांचे भूखंड घशात घातल्याचा आरोप

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील सत्तासमीकरणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. विशेषतः

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी

अंधरेतील पहिल्या पुष्पोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री अक्षय कुमारच्या हस्ते उद्घाटन

भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ अभियानांतर्गत अभिनेता अक्षय कुमार यांनी दिलेल्या शहरव्यापी