‘ए मेरे वतन के लोगो’ आणि रोहित शर्मा; भावूक करणारा व्हिडिओ चर्चेत

मुंबई : रोहित शर्मा केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही आपलं देशप्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. पुन्हा एकदा रोहित शर्माच्या देशभक्तीची झलक पाहायला मिळाली असून, ‘हिटमॅन’चा एक भावूक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


रोहित शर्मा सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे. मात्र व्यस्त क्रिकेट वेळापत्रक असूनही त्याने आपल्या कुटुंबासाठी वेळ काढत मुलगी समायराच्या शाळेतील वार्षिक कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. याच कार्यक्रमादरम्यान घडलेला एक क्षण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


शाळेच्या वार्षिक सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशभक्तीपर गाण्यांचाही समावेश होता. कार्यक्रमात जेव्हा लता मंगेशकर यांनी अजरामर केलेले ‘ए मेरे वतन के लोगो…’ हे गीत सादर करण्यात आले, तेव्हा वातावरण भारावले होते.


व्हिडीओच्या सुरुवातीला मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हेही गाणं ऐकत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर कॅमेरा रोहित शर्माकडे वळतो आणि त्याच क्षणी रोहित भावूक झालेला पाहायला मिळतो. गाण्याचे शब्द कानावर पडताच रोहितच्या डोळ्यांत अश्रू तरळू लागतात. तो आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतो, मात्र त्याचे डोळे डबडबलेले आणि लाल झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं.


‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणं सुरू असताना रोहित शांतपणे बसून ते ऐकत होता. हा क्षण पाहून अनेक चाहत्यांना भारताच्या टी-२० वर्ल्ड कप विजयानंतरचा तो प्रसंग आठवल्याशिवाय राहिला नाही, जेव्हा रोहित शर्माने तिरंगा हातात घेऊन मैदानात विजयाचा जल्लोष केला होता.


या देशभक्तीपर गाण्याने रोहितला पुन्हा एकदा भावूक केलं असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून रोहितच्या देशप्रेमाचं कौतुक केलं जात असून, ‘हिटमॅन’चा हा भावूक क्षण अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे

Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या