ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा एकीचा नारा

ठाणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकीचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर कडवे विरोधक बनलेले शरद पवार गट आणि अजित पवार गट आता विजयासाठी एकत्र येण्याचे संकेत देत आहेत. दोन्ही गटांनी सांगितले की, आघाडीचा प्रस्ताव आला तर वरिष्ठांकडे पाठवून त्यावर विचार केला जाईल, त्यामुळे निवडणुकीत आघाडीच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी शरद पवार गटाची साथ दिली आहे, तर माजी खासदार आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांचा गट अजित पवार यांचा पाठिंबा करतो. एकेकाळी कट्टर समर्थक म्हणून ओळखले गेलेले हे नेते आता फुटीनंतर कडवे विरोधक बनले, मात्र आता ऐक्याचा सूर लावला जात आहे.


ठाण्यातील राबोडी, कळवा आणि मुंब्रा भागांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवत असून, कळवा-मुंब्रा भागात बहुसंख्या जागा सोडल्या जाणार आहेत. अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “आमदार जितेंद्र आव्हाड हे आमचे शत्रू नाहीत. ३० तारखेपर्यंत प्रस्ताव आला तर तो वरिष्ठांकडे पाठवून त्यावर विचार करू. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणणे हे महत्त्वाचे आहे. ठाणे शहरात पक्ष वाढवायचा असेल तर आता विचार करावा.”


त्यावर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान म्हणाले, “अजित पवार गटही आमचा दुश्मन नाही. जर आघाडीचा प्रस्ताव आला तर तो वरिष्ठांकडे पाठवू. निवडणूक आधी की नंतर एकत्र येणे बघू, पण निवडणुकीपूर्वी एकत्र आले तर पक्षाची ताकद दिसेल.” सध्या या आश्वासक विधानांमुळे ठाणे महापालिका निवडणुकीत दोन्ही गटांच्या आघाडीच्या शक्यतेची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Nitesh Rane : रामाच्या नावाने राजकारण बंद करा; संघभूमीवर जाऊन नाक घासा!

- संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा मंत्री नितेश राणेंकडून समाचार मुंबई : उबाठा गटाचे खासदार

Mahatma Jyotirao Phule : केंद्र सरकारकडून महात्मा जोतीराव फुले यांचा भारत सरकारच्या राजपत्रात सन्मानपूर्वक उल्लेख...

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना जनतेने बहाल केलेल्या महात्मा या सर्वोच्च पदवीचा ऐतिहासिक सन्मान

Anna Bansode : अजितसृष्टीसाठी पुनर्वसन प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य पद्धतीने राबवा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आणि आठवणींची

Koel Mallick : तृणमूल काँग्रेसला मोठा झटका; खासदार कोयल मल्लिक यांचा राजीनामा

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला (TMC) पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. पक्षाच्या राज्यसभा खासदार

Sanjay Raut Vitthal statement : विठ्ठलाचा अपमान केल्याबद्दल संजय राऊतांनी माफी मागावी; भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई : विठ्ठलाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा (BJP) प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव