ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा एकीचा नारा

ठाणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकीचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर कडवे विरोधक बनलेले शरद पवार गट आणि अजित पवार गट आता विजयासाठी एकत्र येण्याचे संकेत देत आहेत. दोन्ही गटांनी सांगितले की, आघाडीचा प्रस्ताव आला तर वरिष्ठांकडे पाठवून त्यावर विचार केला जाईल, त्यामुळे निवडणुकीत आघाडीच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी शरद पवार गटाची साथ दिली आहे, तर माजी खासदार आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांचा गट अजित पवार यांचा पाठिंबा करतो. एकेकाळी कट्टर समर्थक म्हणून ओळखले गेलेले हे नेते आता फुटीनंतर कडवे विरोधक बनले, मात्र आता ऐक्याचा सूर लावला जात आहे.


ठाण्यातील राबोडी, कळवा आणि मुंब्रा भागांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवत असून, कळवा-मुंब्रा भागात बहुसंख्या जागा सोडल्या जाणार आहेत. अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “आमदार जितेंद्र आव्हाड हे आमचे शत्रू नाहीत. ३० तारखेपर्यंत प्रस्ताव आला तर तो वरिष्ठांकडे पाठवून त्यावर विचार करू. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणणे हे महत्त्वाचे आहे. ठाणे शहरात पक्ष वाढवायचा असेल तर आता विचार करावा.”


त्यावर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान म्हणाले, “अजित पवार गटही आमचा दुश्मन नाही. जर आघाडीचा प्रस्ताव आला तर तो वरिष्ठांकडे पाठवू. निवडणूक आधी की नंतर एकत्र येणे बघू, पण निवडणुकीपूर्वी एकत्र आले तर पक्षाची ताकद दिसेल.” सध्या या आश्वासक विधानांमुळे ठाणे महापालिका निवडणुकीत दोन्ही गटांच्या आघाडीच्या शक्यतेची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचे नाव अंतिम?

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पुतणे समीर यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याबाबत झाली

Navnath Ban : संजय राऊतांनी आधी स्वत: गाढव नाक्यावर आंदोलन करावे; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला !

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला Mumbai : आजवर संजय राऊत एकाही आंदोलनात सहभागी झाले नाहीत.

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह कायम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; 'पैशांपेक्षा प्रेमाने माणसे जिंकता येतात' म्हणत सुप्रिया सुळेंना टोला मुंबई : नवी

Sunetra Pawar : बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा...

मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश मुंबई:-

Mantri Nitesh Rane : 'देवभाऊ'च कोकणच्या चित्रपटाचे डायरेक्टर!

मंत्री नितेश राणे; 'त्यांनी दिलेल्या जबाबदारीची मी केवळ अंमलबजावणी केली' मुंबई : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

MVA : विधान परिषद निवडणुक; अर्ज माघारीवरून 'मविआ'त फूट

घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांना संख्याबळाचा विसर; पुणे काँग्रेसकडून आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव मुंबई :