ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा एकीचा नारा

ठाणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकीचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर कडवे विरोधक बनलेले शरद पवार गट आणि अजित पवार गट आता विजयासाठी एकत्र येण्याचे संकेत देत आहेत. दोन्ही गटांनी सांगितले की, आघाडीचा प्रस्ताव आला तर वरिष्ठांकडे पाठवून त्यावर विचार केला जाईल, त्यामुळे निवडणुकीत आघाडीच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी शरद पवार गटाची साथ दिली आहे, तर माजी खासदार आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांचा गट अजित पवार यांचा पाठिंबा करतो. एकेकाळी कट्टर समर्थक म्हणून ओळखले गेलेले हे नेते आता फुटीनंतर कडवे विरोधक बनले, मात्र आता ऐक्याचा सूर लावला जात आहे.


ठाण्यातील राबोडी, कळवा आणि मुंब्रा भागांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवत असून, कळवा-मुंब्रा भागात बहुसंख्या जागा सोडल्या जाणार आहेत. अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “आमदार जितेंद्र आव्हाड हे आमचे शत्रू नाहीत. ३० तारखेपर्यंत प्रस्ताव आला तर तो वरिष्ठांकडे पाठवून त्यावर विचार करू. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणणे हे महत्त्वाचे आहे. ठाणे शहरात पक्ष वाढवायचा असेल तर आता विचार करावा.”


त्यावर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान म्हणाले, “अजित पवार गटही आमचा दुश्मन नाही. जर आघाडीचा प्रस्ताव आला तर तो वरिष्ठांकडे पाठवू. निवडणूक आधी की नंतर एकत्र येणे बघू, पण निवडणुकीपूर्वी एकत्र आले तर पक्षाची ताकद दिसेल.” सध्या या आश्वासक विधानांमुळे ठाणे महापालिका निवडणुकीत दोन्ही गटांच्या आघाडीच्या शक्यतेची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज - राघव चड्ढा यांचा टोला

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सध्या अंतर्गत नाराजी आणि वादांच्या भोवऱ्यात अडकला असून, पक्षाने आत्मचिंतन

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी

Nitesh Rane : 'मराठीचा आग्रह धरताना हिंदूंमध्ये फूट पाडू नका'

सिंधुदुर्ग : 'प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमच्या परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेला