संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?


नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे एक मोठा ट्विस्ट आला आहे.


संजय कपूर यांनी एकूण तीन वेळा लग्न केले. पहिले लग्न फॅशन डिझायनर नंदिता महातानिशीशी केले. काही काळानंतर घटस्फोट घेतला आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्न केले. या लग्नानंतर त्याला समायरा ही मुलगी आणि कियान हा मुलगा झाला. नंतर २०१४ मध्ये करिश्मा आणि संजय यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं. त्यांना अझारियस हा मुलगा झाला. संजयने प्रिया सचदेवचा पहिला पती विक्रम चटवालपासून झालेली मुलगी सफिरा चटवाल हिलाही दत्तक घेतलं. यानंतर काही काळाने संजय मृत्यू झाला. संजयच्या पश्चात त्याच्या संपत्तीवरुन वाद सुरू झाला आहे.



काय आहे वाद ?


संजय आणि करिश्माच्या मुलांनी म्हणजेच समायरा आणि कियानने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली आहे. करिश्माच्या मुलांनी दावा केला की त्यांचे वडील संजय कपूर यांचं मृत्यूपत्र बनावट आहे, ते जिवंत असतानाच त्यात छेडछाड करण्यात आली होती आणि बदल करण्यात आले होते. गेल्या सुनावणीत वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला की, संजय त्यांच्या मुलांसोबत सुट्टीवर असताना मृत्यूपत्र बदलण्यात आलं होतं. मृत्यूपत्रात सुधारणा करणाऱ्या व्यक्तीला संजय कपूरच्या मृत्यूच्या एक दिवसानंतर लगेच कंपनीचा संचालक बनवण्यात आलं.


संजयची पत्नी प्रिया सचदेव कपूर यांनी मृत्यूपत्रात बदल केल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा केला आहे. आता समायरा आणि कियानने मृत्यूपत्राच्या फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली आहे. समायरा आणि कियानच्या दाव्यानुसार संजय कपूर यांनी त्यांना मालमत्तेत हक्क देणार असल्याचे सांगितले होते. पण न्यायालयापुढे आलेल्या मृत्यूपत्रात उल्लेखच दिसत नाही. यामुळे प्रियाने संजयच्या मृत्यूपत्रात छेडछाड करुन स्वार्थ साधल्याचा आरोप समायरा आणि कियानने केला आहे.


फॉरेन्सिक तपासणीच्या मागणीला प्रियाच्या वकिलाने विरोध केला आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामुळे पुढील सुनावणीत काय होणार ? दिल्ली उच्च न्यायालय काय निर्णय किंवा निर्देश देणार याकडे संजय कपूरच्या नातलगांचे लक्ष आहे.


Comments
Add Comment

National Film Awards : 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीची दमदार कामगिरी; 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचे मानले जाणारे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले असून

Aamir Khan : आमिर खानला बिश्नोई गँगच्या नावाने धमकी? सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ; ‘लव्ह जिहाद’चा केला उल्लेख

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या (Lawrence Bishnoi Gang) नावाने सोशल मीडियावर (Social Media) धमकी

Upcoming Hollywood Movies Releases : २०२६ मध्ये चित्रपटसृष्टीत महाधमाका! ‘स्पायडर-मॅन’पासून ‘अ‍ॅव्हेंजर्स डूम्सडे’पर्यंत मोठ्या सिनेमांची मेजवानी

हॉलीवूड (Hollywood) सिनेमांसाठी २०२६ हे वर्ष खास ठरणार आहे. क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ (The Odyssey) या बिग बजेट

Aamir Khan On Sonam Wangchuk : 'रँचो' आणि सोनम वांगचुक यांचा संबंध नाही! आमिर खाननं '3 इडियट्स'च्या गैरसमजावर दिलं स्पष्टीकरण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) ‘3 इडियट्स’ (3 Idiots) चित्रपटातील ‘रँचो’ (Rancho) हे पात्र प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक