संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?


नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे एक मोठा ट्विस्ट आला आहे.


संजय कपूर यांनी एकूण तीन वेळा लग्न केले. पहिले लग्न फॅशन डिझायनर नंदिता महातानिशीशी केले. काही काळानंतर घटस्फोट घेतला आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्न केले. या लग्नानंतर त्याला समायरा ही मुलगी आणि कियान हा मुलगा झाला. नंतर २०१४ मध्ये करिश्मा आणि संजय यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं. त्यांना अझारियस हा मुलगा झाला. संजयने प्रिया सचदेवचा पहिला पती विक्रम चटवालपासून झालेली मुलगी सफिरा चटवाल हिलाही दत्तक घेतलं. यानंतर काही काळाने संजय मृत्यू झाला. संजयच्या पश्चात त्याच्या संपत्तीवरुन वाद सुरू झाला आहे.



काय आहे वाद ?


संजय आणि करिश्माच्या मुलांनी म्हणजेच समायरा आणि कियानने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली आहे. करिश्माच्या मुलांनी दावा केला की त्यांचे वडील संजय कपूर यांचं मृत्यूपत्र बनावट आहे, ते जिवंत असतानाच त्यात छेडछाड करण्यात आली होती आणि बदल करण्यात आले होते. गेल्या सुनावणीत वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला की, संजय त्यांच्या मुलांसोबत सुट्टीवर असताना मृत्यूपत्र बदलण्यात आलं होतं. मृत्यूपत्रात सुधारणा करणाऱ्या व्यक्तीला संजय कपूरच्या मृत्यूच्या एक दिवसानंतर लगेच कंपनीचा संचालक बनवण्यात आलं.


संजयची पत्नी प्रिया सचदेव कपूर यांनी मृत्यूपत्रात बदल केल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा केला आहे. आता समायरा आणि कियानने मृत्यूपत्राच्या फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली आहे. समायरा आणि कियानच्या दाव्यानुसार संजय कपूर यांनी त्यांना मालमत्तेत हक्क देणार असल्याचे सांगितले होते. पण न्यायालयापुढे आलेल्या मृत्यूपत्रात उल्लेखच दिसत नाही. यामुळे प्रियाने संजयच्या मृत्यूपत्रात छेडछाड करुन स्वार्थ साधल्याचा आरोप समायरा आणि कियानने केला आहे.


फॉरेन्सिक तपासणीच्या मागणीला प्रियाच्या वकिलाने विरोध केला आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामुळे पुढील सुनावणीत काय होणार ? दिल्ली उच्च न्यायालय काय निर्णय किंवा निर्देश देणार याकडे संजय कपूरच्या नातलगांचे लक्ष आहे.


Comments
Add Comment

Batwara 1947: सनी देओलच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलले; 'लाहोर 1947' आता 'बंटवारा' म्हणून प्रेक्षकांसमोर

Bollywood  News: सनी देओलच्या (Sunny Deol) बहुचर्चित पीरियड ड्रामा चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 'लाहोर १९४७'

PATRAPATRI : ‘पत्रापत्री’ शब्दांची जादू आणि मैत्रीच्या आठवणींचा शंभर प्रयोगांचा यशस्वी प्रवास!

Vijay Kenkre and Dilip Prabhavalkar : सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत ज्या एका प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तो

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Bharat Bhagy Vidhata Movie:  ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावर नर्सेस संघटनेचा आक्षेप; प्रदर्शनापूर्वीच निर्माण झाला वाद

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhagy Vidhata) हा चित्रपट सध्या चर्चेत असून

'Deool Band 2' Box Office Collection : मराठी सिनेमाचा नवा विक्रम? 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने दमदार वाटचाल!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) चित्रपटाची जोरदार

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी