वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश


मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी भागांतील सरकारी आणि खासगी प्रकल्पांमध्ये वायुप्रदूषणाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. परिणामी, शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. असे असतानाही संबंधित प्रकल्पांवर कारवाई का केली नाही, याचे स्पष्टीकरण न्यायालयात हजर राहून देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकाऱ्यांना दिले.


वायुप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने निदर्शनास आणले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि एमपीसीबी सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंह यांना हजर राहण्याचे निर्दश दिले. ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने सरकारी आणि खासगी प्रकल्प सुरू आहेत, तेथे वायुप्रदूषणाच्या नियमांचे आणि पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येते की नाही, हे तपासण्यासाठी न्यायालयाने वकील आणि काही अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. या समितीने सोमवारी न्यायालयात अहवाल दाखल केला. मुख्य न्या. चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून