खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार


नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघात खेळत असलेल्या खेळाडूंनाही ही स्पर्धा खेळणे बंधनकारक आहे. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू देखील ही स्पर्धा खेळताना दिसून येणार आहेत. विराट दिल्लीकडून, तर रोहित मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. विराट कोहली बंगळूरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पुनरागमन करणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना त्याला खेळताना पाहण्याची संधी मिळणार नाही. हा सामना बंद दाराआड खेळवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.


कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केसीए) ला चिन्नास्वामी स्टेडियमवर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने यातून मार्ग काढत स्टेडियममधील २ स्टँड जनतेसाठी खुले करण्याचा पर्याय शोधला होता. त्यामुळे २००० ते ३००० क्रिकेट चाहते हा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहू शकत होते; परंतु कर्नाटक क्रिकेट सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.


इतरवेळी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाते. पण यावेळी विराट कोहली आणि ऋषभ पंत देखील खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


दिल्लीचा पहिला सामना आंध्र प्रदेश संघाविरुद्ध होणार आहे. कोहली आणि पंत सोमवारी रात्री उशिरा बंगळूरुत दाखल झाले आहेत. या सामन्यापूर्वी विराट दिल्ली संघासोबत सराव करणार असल्याची अपेक्षा आहे. ४ जूनला आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली होती. त्यानंतर या मैदानावर एकही सामना झाला नव्हता. त्यामुळे महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील सामने देखील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये हलवण्यात आले होते.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या