खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार


नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघात खेळत असलेल्या खेळाडूंनाही ही स्पर्धा खेळणे बंधनकारक आहे. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू देखील ही स्पर्धा खेळताना दिसून येणार आहेत. विराट दिल्लीकडून, तर रोहित मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. विराट कोहली बंगळूरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पुनरागमन करणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना त्याला खेळताना पाहण्याची संधी मिळणार नाही. हा सामना बंद दाराआड खेळवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.


कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केसीए) ला चिन्नास्वामी स्टेडियमवर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने यातून मार्ग काढत स्टेडियममधील २ स्टँड जनतेसाठी खुले करण्याचा पर्याय शोधला होता. त्यामुळे २००० ते ३००० क्रिकेट चाहते हा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहू शकत होते; परंतु कर्नाटक क्रिकेट सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.


इतरवेळी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाते. पण यावेळी विराट कोहली आणि ऋषभ पंत देखील खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


दिल्लीचा पहिला सामना आंध्र प्रदेश संघाविरुद्ध होणार आहे. कोहली आणि पंत सोमवारी रात्री उशिरा बंगळूरुत दाखल झाले आहेत. या सामन्यापूर्वी विराट दिल्ली संघासोबत सराव करणार असल्याची अपेक्षा आहे. ४ जूनला आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली होती. त्यानंतर या मैदानावर एकही सामना झाला नव्हता. त्यामुळे महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील सामने देखील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये हलवण्यात आले होते.

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना