‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, आत्ता जीव वाचवणे महत्वाचे’

बांगलादेशात लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात


ढाका : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा सर्वाधिक फटका आता प्रसारमाध्यमांना बसत असून, तिथे पत्रकारितेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. "आज आमच्यासमोर अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकवण्याचा मुद्दा उरलेला नाही, तर स्वतःचा जीव कसा वाचवायचा हा मुख्य प्रश्न आहे," अशा शब्दांत बांगलादेशातील अग्रगण्य वृत्तपत्रांच्या संपादकांनी आपली व्यथा मांडली आहे.


गेल्या काही दिवसांत ढाका येथील 'प्रथम आलो' आणि 'द डेली स्टार' यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर जमावाने हिंसक हल्ले केले. आंदोलकांनी केवळ निषेध न नोंदवता कार्यालयांना आग लावून पत्रकारांना आत जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. 'डेली स्टार'चे संपादक महफूज अनाम यांनी सांगितले की, "हल्ला झाला तेव्हा २६ ते २७ कर्मचारी इमारतीच्या छतावर अडकले होते आणि अग्निशमन दलाला तिथे पोहोचण्यापासून आंदोलकांनी रोखून धरले होते. हा केवळ निषेध नव्हता, तर पत्रकारांच्या हत्येचा प्रयत्न होता."


हल्लेखोरांनी या वृत्तपत्रांवर "भारत आणि पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या हितासाठी काम करत असल्याचा" खोटा शिक्का मारला आहे. कट्टरपंथी गटांकडून सोशल मीडियावर उघडपणे पत्रकारांच्या घरांचे पत्ते देऊन त्यांना शोधून मारण्याचे आवाहन केले जात आहे. या दहशतीमुळे अनेक पत्रकारांनी आपली कामे थांबवली असून ते भूमिगत झाले आहेत.


मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने या हल्ल्यांचा निषेध केला असला आणि ९ जणांना अटक केली असली तरी, प्रत्यक्षात हिंसाचार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. मानवाधिकार संघटनांनी म्हटले आहे की, वारंवार संरक्षण मागूनही पोलिसांनी वेळीच मदत न केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ज्या देशात पत्रकारांना त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी जीवाच्या भीतीने लढावे लागते, तिथे लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात असते. बांगलादेशातील ही परिस्थिती केवळ त्या देशापुरती मर्यादित नसून, संपूर्ण दक्षिण आशियातील पत्रकारितेसाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एक धोक्याची घंटा मानली जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईच्या काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता

मुंबई : राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून थंडीची तीव्रता कमी-अधिक होत आहे. त्यातच मुंबई शहर आणि

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ

ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार अनावरण महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी

मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा!

मुंबई : कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने

‘मराठी भाषा’ ही नदीप्रमाणे सतत वाहणारी परंपरा

मुंबई : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची नदीसारखी अविरतपणे वाहणारी सांस्कृतिक परंपरा आहे,

मुंबईत दिंडोशी मनपा वसाहतीत दूषित आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा

​मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 'पी पूर्व' (P-East) विभागांतर्गत येणाऱ्या गोरेगाव (पूर्व) येथील दिंडोशी मनपा वसाहत