‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, आत्ता जीव वाचवणे महत्वाचे’

बांगलादेशात लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात


ढाका : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा सर्वाधिक फटका आता प्रसारमाध्यमांना बसत असून, तिथे पत्रकारितेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. "आज आमच्यासमोर अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकवण्याचा मुद्दा उरलेला नाही, तर स्वतःचा जीव कसा वाचवायचा हा मुख्य प्रश्न आहे," अशा शब्दांत बांगलादेशातील अग्रगण्य वृत्तपत्रांच्या संपादकांनी आपली व्यथा मांडली आहे.


गेल्या काही दिवसांत ढाका येथील 'प्रथम आलो' आणि 'द डेली स्टार' यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर जमावाने हिंसक हल्ले केले. आंदोलकांनी केवळ निषेध न नोंदवता कार्यालयांना आग लावून पत्रकारांना आत जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. 'डेली स्टार'चे संपादक महफूज अनाम यांनी सांगितले की, "हल्ला झाला तेव्हा २६ ते २७ कर्मचारी इमारतीच्या छतावर अडकले होते आणि अग्निशमन दलाला तिथे पोहोचण्यापासून आंदोलकांनी रोखून धरले होते. हा केवळ निषेध नव्हता, तर पत्रकारांच्या हत्येचा प्रयत्न होता."


हल्लेखोरांनी या वृत्तपत्रांवर "भारत आणि पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या हितासाठी काम करत असल्याचा" खोटा शिक्का मारला आहे. कट्टरपंथी गटांकडून सोशल मीडियावर उघडपणे पत्रकारांच्या घरांचे पत्ते देऊन त्यांना शोधून मारण्याचे आवाहन केले जात आहे. या दहशतीमुळे अनेक पत्रकारांनी आपली कामे थांबवली असून ते भूमिगत झाले आहेत.


मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने या हल्ल्यांचा निषेध केला असला आणि ९ जणांना अटक केली असली तरी, प्रत्यक्षात हिंसाचार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. मानवाधिकार संघटनांनी म्हटले आहे की, वारंवार संरक्षण मागूनही पोलिसांनी वेळीच मदत न केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ज्या देशात पत्रकारांना त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी जीवाच्या भीतीने लढावे लागते, तिथे लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात असते. बांगलादेशातील ही परिस्थिती केवळ त्या देशापुरती मर्यादित नसून, संपूर्ण दक्षिण आशियातील पत्रकारितेसाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एक धोक्याची घंटा मानली जात आहे.

Comments
Add Comment

कोस्टल रोडवरील पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्तावही रोखला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

मार्च उजाडला तरी मुंबईतील नालेसफाईची कामे सुरु होईनात; स्थायी समितीत सदस्य आक्रमक

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने पावसाळा पूर्व नालेसफाईचे काम हाती घेतले. एरव्ही निविदा विलंबाने झाल्यामुळे

गारगाई धरणाच्या बांधकामाचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून

Navi Mumbai : पोलीस भरतीदरम्यान नवी मुंबई घडला खळबळजनक प्रकार; चार उमेदवारांनी...

नवी मुंबई: नवी मुंबईतील कळंबोली येथे पोलीस भरती दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु

जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र विषयक कार्यवाहीचा महापौर घेणार दर महिन्याला आढावा

मुंबई: जन्म नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र देणे, हा फक्त शासकीय दस्तावेज देण्यापुरता मर्यादित विषय नसून त्याचाच

उपमहापौरांची कुपर रुग्णालयाला भेट; स्वच्छता आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर दिले कारवाईचे आदेश

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अवघ्या पाच दिवसांपूर्वी विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे