मुंबईसाठी नरेंद्र मोदी , अमित शहा यांच्यात तोफा धडाडणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्याची सत्ता मिळवल्यानंतर मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.


१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी भाजपचे हे दोन्ही सर्वोच्च नेते मुंबईत प्रचाराचा धडाका लावणार आहेत. ७ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार असून, मुलुंडसह दोन महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा पार पडतील. ११ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत जाहीर सभा होणार आहे. मोदींच्या सभेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १२ जानेवारी रोजी सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील मुंबईत असणार असून, ते पदयात्रा किंवा जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे.


पुण्यातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने महायुतीत काहीशी नाराजी पाहायला मिळाली होती. यावर बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी ‘युद्ध, प्रेम आणि निवडणुकीत सगळे माफ असते’, असे मिश्किल विधान करत, निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व काही फेअर असल्याचे सुचित केले आहे.


मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - मनसे विरूद्ध भाजप - शिवसेना शिंदे गट यांच्यात प्रमुख लढत असेल. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट व काँग्रेस हे वेगवेगळे लढण्याची शक्यता आहे. उबाठा गटासाठी व मनसेसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. जर मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातून निसटली तर तिथून त्यांना बाऊन्स बॅक करणे खूप जड जाण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळेच दोन्ही ठाकरे बंधू या निवडणुकीत आपला सगळा जोर लावण्याची शक्यता आहे. या हायव्होल्टेज प्रचार दौऱ्यांमुळे ही निवडणूक अटीतटीची व ऐतिहासिक ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोला मुंबई : "महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

महाराष्ट्राची विकासयात्रा थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले अडथळ्यांचे राजकारण आता पूर्णपणे संपले असून, महाराष्ट्र

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- हिंदी सक्तीच्या निर्णयावर सही उद्धव ठाकरेंची मुंबई : "महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदी सक्तीबाबत निर्णय