मुंबईसाठी नरेंद्र मोदी , अमित शहा यांच्यात तोफा धडाडणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्याची सत्ता मिळवल्यानंतर मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.


१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी भाजपचे हे दोन्ही सर्वोच्च नेते मुंबईत प्रचाराचा धडाका लावणार आहेत. ७ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार असून, मुलुंडसह दोन महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा पार पडतील. ११ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत जाहीर सभा होणार आहे. मोदींच्या सभेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १२ जानेवारी रोजी सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील मुंबईत असणार असून, ते पदयात्रा किंवा जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे.


पुण्यातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने महायुतीत काहीशी नाराजी पाहायला मिळाली होती. यावर बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी ‘युद्ध, प्रेम आणि निवडणुकीत सगळे माफ असते’, असे मिश्किल विधान करत, निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व काही फेअर असल्याचे सुचित केले आहे.


मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - मनसे विरूद्ध भाजप - शिवसेना शिंदे गट यांच्यात प्रमुख लढत असेल. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट व काँग्रेस हे वेगवेगळे लढण्याची शक्यता आहे. उबाठा गटासाठी व मनसेसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. जर मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातून निसटली तर तिथून त्यांना बाऊन्स बॅक करणे खूप जड जाण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळेच दोन्ही ठाकरे बंधू या निवडणुकीत आपला सगळा जोर लावण्याची शक्यता आहे. या हायव्होल्टेज प्रचार दौऱ्यांमुळे ही निवडणूक अटीतटीची व ऐतिहासिक ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील