मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. जेमीमाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरीत विक्रमी धावांचा पाठलाग करताना अविस्मरणीय शतक झळकावले होते. जेमिमाहला या स्पर्धेच्या सुरुवातीला काही खास करता आले नाही. मात्र जेमीने निर्णायक क्षणी कमबॅक करत भारतासाठी बहुमुल्य योगदान दिले. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर आता श्रीलंकेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. दिल्ली कॅपिट्ल्स फ्रँचायजीने डब्ल्यूपीएलच्या चौथ्या मोसमाआधी कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेग लॅनिंग हीच्या जागी जेमीला नेतृत्वाची धुरा देण्यात येणार आहे.


दिल्लीचे गेल्या २ हंगामात मेग लॅनिंग हीने नेतृत्व केले होते. जेमीच्या कर्णधारपदी २३ डिसेंबरला नियुक्ती केली जाणार आहे. याबाबत २३ डिसेंबरला अधिकृत घोषणा केली जाणार आहे. क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, जेमीला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमासाठी गेल्या महिन्यात मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिट्ल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी जेमीला कर्णधार करण्याचे संकेत दिले होते. दिल्लीने दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हीला ऑक्शनद्वारे आपल्या गोटात घेतले. त्यानंतर पार्थ जिंदाल यांनी भारतीय खेळाडूला कर्णधार करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे लॉरा कर्णधार होणार नसल्याचे स्पष्ट आहे. अशात आता जेमीची कर्णधारपदी वर्णी लागणार असल्याचं निश्चित समजले जात आहे.


जेमीची डब्ल्यूपीएल कारकीर्द


जेमीने आतापर्यंत डब्लूपीएलच्या इतिहासातील ३ हंगामात एकूण २७ सामने खेळले आहेत. जेमीने या २७ सामन्यांमधील २४ डावांत ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जेमीने २८.२६ च्या सरासरीने आणि १३९.६६ च्या स्ट्राईक रेटने ५०७ धावा केल्या आहेत.


जेमीची उपांत्य फेरीत ऐतिहासिक खेळी


जेमीने नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत ऐतिहासिक असं शतक झळकावलं होतं. ऑस्ट्रेलियाने भारताला त्या सामन्यात अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ३४० धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान जेमीमाह रॉड्रिग्स हीच्या शतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केले होतं. जेमीने त्या सामन्यात आक्रमक खेळी करत नाबाद १२७ धावा करून भारताला विजयी केले होते.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक

भारतीय संघ कसोटीत अपयशी; टी - २० त ‘ब्लॉकबस्टर’!

मुंबई  : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२५ हे वर्ष संमिश्र यश देणारे ठरले. या वर्षात भारताने १० कसोटी, १४ वनडे आणि २२