उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे खोबरं.खोबऱ्याशिवाय जेवण हे अपुरेच.पालेभाजीत किंवा फळभाजीत बनवल्यानंतर त्यात सुकं किंवा ओल खोबर किसून टाकले, भाजीची चव वाढते एवढेच नाही तर, पोह्यावरहही खोबर किसून टाकले जात .त्यामुळे पोह्यांना एक वेगळीच चव प्राप्त होते .ओल्या खोबऱ्यासोबतच सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर केला जातो. सुक्या खोबऱ्यापासून वाटप बनवले जाते. खोबर खाल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि आतड्यांचे कार्य सुरळीत राहते.


कोकणात मोठ्या प्रमाणात खोबऱ्याचा वापर केला जातो .आणि प्रत्येक पदार्थंमध्ये ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचा समावेश असतो .सुक्या खोबऱ्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.यामध्ये प्रथिने, फायबर, सेलेनियम, तांबे, लोह, कॅल्शियम आणि मॅंगनीज यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळून येतात.सुके खोबरे हे हदय,मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.नारळात हेल्दी फॅट असते,ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसते आणि सेलेनियम, फायबर, कॉपर आणि मँगनीजचे प्रमाण देखील अधिक असते.या सर्वांचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.


हिमोग्लोबिनची पातळी वाढते:


हिमोग्लोबिनची पातळी जर वाढवायची असेल तर रोज खावा एक खोबऱ्याचा तुकडा .अ‍ॅनिमियाचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात सुक्या नारळाचा समावेश करू शकता.सकाळी उठल्यानंतर सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा चावून खाल्ल्यास महिनाभरात रक्ताची पातळी भरून निघेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.


रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते:


सुक्या खोबऱ्यामध्ये लोह खूप जास्त प्रमाणात आढळते, त्यामुळे याच्या सेवनाने लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून हे पोषक घटक विषाणूजन्य रोगांपासून शरीराचे रक्षण होते.अनेक पोषक घटक शरीराला मिळतात.सुक्या खोबऱ्याच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.


संधिवाताचा धोका कमी:


आहारात नारळाचा समावेश केल्याने संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांचा धोकाही कमी होतो.आपली स्मरणशक्ती वाढते.मानसिक आरोग्यासाठी खोबरे महत्वाचे आहे.यामध्ये असलेले सेलेनियम हे एक प्रकारचे खनिज आहे जे शरीराला एंजाइम तयार करण्यास मदत करते.त्यामुळे आपण निरोगी राहतो .


सुक्या खोबऱ्यामध्ये असलेले तांबे ऊर्जा पातळीला समर्थन देते. तसेच लाल रक्तपेशी आणि कोलेजन तयार होण्यास मदत होते.रक्तदाब आणि हृदयाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी शरीराला फायबरची गरज असते.वाळलेल्या खोबऱ्यामध्ये फायबर जास्तप्रमाणात असते त्यामुळे स्ट्रोक मधुमेह उच्च रक्तदाबाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

HP कंपनीकडून हिवाळ्यात खास ऑफर,आता स्वस्तात इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करा! 'ही' आहे माहिती

मोहित सोमण: अनेक कंपन्या हिवाळी ऑफर बाजारात आणत आहेत. त्यामुळे ई कॉमर्स व ऑफलाईन सेल मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ