U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. या पराभवामागची नेमकी कारणे शोधण्यासाठी बीसीसीआयकडून संपूर्ण संघाच्या कामगिरीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. २२ डिसेंबर रोजी झालेल्या बोर्डाच्या एपेक्स कौन्सिलच्या बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.


अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून तब्बल १९१ धावांनी पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ निर्णायक सामन्यात मात्र पूर्णपणे कोलमडलेला दिसला. गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे प्रभाव टाकू शकली नाही, तर फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. त्यामुळे बीसीसीआयकडून केवळ आढावा घेण्यापुरते न थांबता, टीम मॅनेजमेंटकडून पराभवाबाबत सविस्तर स्पष्टीकरण मागवले जाणार आहे.


आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना एकही सामना गमावला नव्हता. मात्र, विजेतेपदाच्या सामन्यात संघाचा आत्मविश्वास ढासळलेला दिसला. निर्णायक क्षणी अनुभवी आणि आघाडीच्या खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी न केल्याने संघावर दबाव वाढत गेला.


बीसीसीआय अंडर-१९ संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांच्याशी अंतिम सामन्यातील कामगिरीवर थेट चर्चा करणार आहे. ही चर्चा टीम परफॉर्मन्स रिव्ह्यूचा महत्त्वाचा भाग असणार असून, भविष्यातील धोरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्या वर्तणुकीबाबतही बीसीसीआयने नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. या मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते आणि आवश्यक असल्यास कारवाईचाही विचार केला जाऊ शकतो. मात्र, हा मुद्दा अधिकृत रिव्ह्यू प्रक्रियेचा भाग आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.


भारतीय अंडर-१९ संघाला येत्या काळात झिम्बाब्वे आणि नामीबिया येथे होणाऱ्या अंडर-१९ विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे. त्या स्पर्धेसाठी संघाची घोषणा अद्याप झालेली नसल्याने, विश्वचषकापूर्वीच आशिया कपमधील पराभवाचा आढावा पूर्ण करण्यावर बीसीसीआयचा भर आहे. भविष्यात अशा मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागू नये, यासाठी ही समीक्षा महत्त्वाची मानली जात आहे.


Comments
Add Comment

IPL 2026 CSK vs DC : अखेर चेन्नईच्या विजयाचा श्रीगणेशा झालाच! संजू सॅमसन ठरला या हंगामातील पहिला शतकवीर

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ मधील १८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध जोरदार पुनरागमन करणार ?

मुंबई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात पुन्हा एकदा संथ सुरुवात झाल्यानंतर, मुंबई इंडियन्स आता आपल्या परिचित आणि

IPL 2026 Points Table : १५ सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स टॉपवर; हे ४ संघ प्लेऑफच्या रेसमध्ये आघाडीवर

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत १५ सामने पूर्ण झाले असून स्पर्धा आता रंगात आली आहे. काही संघ जबरदस्त

IPL 2026 Wanindu Hasaranga : लखनऊची डोकेदुखी वाढली! स्टार स्पिनर हसरंगा उर्वरित स्पर्धेतून बाहेर

श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) दुखापतीमुळे चालू आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या

IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन