'मामूंची टोळी एकत्र आल्याने भाजपला काही फरक पडत नाही'

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा मंगळवारी होणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी या युतीवर जोरदार हल्लाबोल केला असून, "मामूंची टोळी एकत्र आली तरी मुंबईत काही फरक पडणार नाही," असा टोला लगावला आहे.


दादर येथे माध्यमांशी संवाद साधताना साटम म्हणाले, राजकारणात कुणीही कोणाशी युती करू शकते, एकत्र येऊ शकते किंवा वेगळे होऊ शकते. मात्र, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर याचा काही परिणाम होणार नाही. "मामूंची टोळी एकत्र आली तरी मुंबई मनपा निवडणुकीत काही फरक पडणार नाही. ठाकरे गटाचे नेते-कार्यकर्ते सातत्याने भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मामूंच्या नादी लागल्यामुळे महाराष्ट्रभरात त्यांची दारुण अवस्था झाली आहे. त्यामुळे उरले-सुरलेलेही पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहेत. हे लोक खरेतर हिंदुत्वासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत," असा दावा साटम यांनी केला.


साटम पुढे म्हणाले की, मराठी माणूस पूर्णपणे भाजपच्या आणि महायुतीच्या पाठीशी उभा आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला (रशीद खान) पक्षात प्रवेश दिल्यानंतर खरे हिंदुत्ववादी त्यांचा पक्ष सोडून जात आहेत. मराठी माणसाला चांगलेच माहीत आहे की, गेल्या ११ वर्षांत मुंबई शहराचा आणि मुंबईकरांचा विकास कुणी केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिला. बीडीडी चाळीतील मराठी कुटुंबांना १६० चौ.फूट ऐवजी ५६० चौ.फूट घर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मिळवून दिले. त्यामुळेच मराठी माणूस महायुतीला आशीर्वाद देताना दिसत आहे."



२५ वर्षांत मराठी माणसासाठी काय केले ?


"मुंबई महापालिकेत २५ वर्षे राज्य करूनही त्यांनी मुंबई आणि मराठी माणसासाठी एकही काम दाखवावे. आम्ही गेल्या ११ वर्षांत केलेली १० कामे सहज दाखवू शकतो. गेल्या २५ वर्षांत महापालिकेत बसूनही त्यांच्याकडे एकही काम दाखवायला नाही. किमान भविष्यात काय करणार हे तरी सांगावे. भावनिक मुद्दे सोडले तर दुसरा कोणताच मुद्दा त्यांच्याकडे नाही. मुंबईकरांना त्यांचे खरे स्वरूप कळलेले आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत," असे साटम म्हणाले.

Comments
Add Comment

Nashik : नवीन वीज जोडण्यांसाठी सुमारे ₹४,००० कोटींची तरतूद, उद्योगांसाठी नवीन वीज जोडणीचा खर्च महावितरण करणार

Nashik : राज्यात नवीन वीज जोडण्यांसाठी सुमारे ₹४,००० कोटींची तरतूद करण्यात आली असून, उद्योगांसाठी नवीन वीज जोडणीचा

Nashik : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या 'सूर्य रथाला' नाशिकमध्ये प्रारंभ, ७ दिवस शहराच्या विविध भागात होणार जनजागृती

Nashik : देशात स्वच्छ आणि परवडणाऱ्या ऊर्जेला चालना देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ची (Pradhan Mantri Surya Ghar Free

Digpal Lanjekar's 'Daryabhavani' Movie : 'श्री शिवराज अष्टक'मधील सातवे चित्रपुष्प 'दर्याभवानी'; दमदार टीझरने वाढवली उत्सुकता!

मुंबई : लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित 'श्री शिवराज अष्टक' (Shivraj Ashtak) चित्रपट मालिकेतील सातवे

FIFA World Cup : FIFA वर्ल्ड कपच्या नावाखाली कोट्यवधींचा ऑनलाइन सट्टा! नाशिक सायबर पोलिसांची धडक कारवाई; 5 ताब्यात

FIFA World Cup : सध्या जगभरात फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह सुरु आहे. याचाच गैरफायदा घेत ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्या

TET Paper Leaked : शिक्षक भरतीला पुन्हा धक्का! परीक्षेच्या एक दिवस आधीच टीईटीचा पेपर लीक, उद्याची परीक्षा तात्पुरती स्थगित

ठाणे : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फुटल्याची

Venezuela Earthquakes : ढिगाऱ्याखालून चक्क १८ दिवसाच्या बाळाची सुखरूप सुटका; बचावपथकाची मोठी कामगिरी

व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर दिलासादायक बातमी समोर आली आहे. ला ग्वायरा परिसरात कोसळलेल्या