भारत-श्रीलंका महिला संघांमध्ये टी-२० चा रणसंग्राम

आजपासून मालिकेला सुरुवात


विश्वचषक संघ निवडीसाठी खेळाडूंची कसोटी

विशाखापट्टनम :
२०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकाचे बिगुल आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. भारत आणि श्रीलंका महिला संघांमधील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होत असून, ही मालिका केवळ विजय-पराजयासाठी नसून भविष्यातील 'स्टार्स' शोधण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.या मालिकेतून भारतीय निवड समिती भविष्यातील संघ बांधणीवर भर देत आहे. मुंबई इंडियन्सकडून डब्ल्यूपीएलमध्ये जी. कमलिनी छाप पाडल्यानंतर, ही युवा यष्टिरक्षक-फलंदाज आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या वैष्णवी शर्मा हिच्याकडे भारताची भविष्यातील हुकमी एक्का म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ देखील शशिनी गिम्हानी आणि रश्मिका सेव्वांदी सारख्या खेळाडूंना संधी देऊन भारताला कडवे आव्हान देण्याच्या तयारीत आहे.


२०२६ विश्वचषकाची तालीम इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०२६


टी-२० विश्वचषकापूर्वी खेळाडूंचा फॉर्म आणि मानसिक क्षमता तपासण्यासाठी ही मालिका निर्णायक ठरेल. भारतीय संघ व्यवस्थापन या पाच सामन्यांतून विविध जोड्या आणि रणनीतींचा प्रयोग करणार आहे.


मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक :




  • पहिला सामना: २१ डिसेंबर, विशाखापट्टनम (संध्या ७.००)

  • दुसरा सामना: २३ डिसेंबर, विशाखापट्टनम (संध्या ७.००)

  • तिसरा सामना: २६ डिसेंबर, तिरुवनंतपुरम (संध्या ७.००)

  • चौथा सामना: २८ डिसेंबर, तिरुवनंतपुरम (संध्या ७.००)

  • पाचवा सामना: ३० डिसेंबर, तिरुवनंतपुरम (संध्या ७.००)


असा आहे श्रीलंकेचा महिला संघ :


चामरी अथापथ्थू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा (उपकर्णधार), हसिनी परेरा, विशमी गुणरत्ने, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, इमेशा दुलानी, कौशिनी नुथ्यांगना (यष्टिरक्षक), मालशा शेहानी, इनोका रणवीरा, शशिनी गिम्हानी, निमेषा मधुशानी, काव्या कविंदी, रश्मिका सेव्वांदी, मलकी मदारा.


असा आहे भारतीय महिला संघ :


हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार),शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष (यष्टिरक्षक),जी. कमलिनी (यष्टिरक्षक), एन. श्री चरणी, वैष्णवी शर्मा.

Comments
Add Comment

भारत १९ वर्षांखालील आशिया कप फायनलमध्ये विक्रमी नवव्यांदा विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना आज, २१ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयुष

दुबईत रविवारी भारत-पाक आमने-सामने, आशिया चषकावर कोण नाव कोरणार ?

दुबई  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि पारंपरिक लढत पुन्हा एकदा अंतिम सामन्याच्या निमित्ताने रंगणार आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; गिलला वगळले

मुंबई : भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजीत करत असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ साठी बीसीसीआयच्या निवड

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

भारताचा मालिका विजय

हार्दिक-तिलकच्या वादळानंतर गोलंदाजांचा कहर; विश्वचषकाच्या तयारीला बळ अहमदाबाद  : नरेंद्र मोदी स्टेडियमवर

India vs South Africa, 5th T20I : अहमदाबादमध्ये तिरंगा फडकला! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय; मालिका ३-१ ने खिशात

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी