बांगलादेशात हिंसाचार उफाळला! इन्कलाब मंचचे प्रवक्ते हादी यांच्या मृत्यूमुळे देशाला दंगलीचे स्वरूप

बांगलादेश: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत करणाऱ्या युवा चळवळीतील प्रमुख नेत्याच्या मृत्यूनंतर बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. गेल्या आठवड्यात ढाका येथील मशिदीतून बाहेर पडताना शरीफ उस्मान हादी यांच्यावर मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. दरम्यान गुरुवारी (१८ डिसेंबर) सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशाला दंगलीचे स्वरूप आले आहे.


या प्रकरणात मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी इन्कलाब मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले. तसेच एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. हादी यांच्या मृत्यूची बातमी देशभरात पसरताच, निदर्शक शाहबागमध्ये जमले आणि वाहतूक रोखली. तसेच हादीला न्याय मिळावा अशी मागणी करत घोषणाबाजी केली. यावेळी निदर्शकांनी अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करत घोषणाबाजी केली.




दरम्यान, राजशाही विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मोठा निषेध मोर्चा काढल्यानंतर राजशाही शहरात तणाव निर्माण झाला. विद्यापीठ कॅम्पसपासून सुरू झालेले हे निदर्शने अखेर शहराच्या मध्यभागी पोहोचताच बंदी घातलेल्या अवामी लीग पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तसेच निदर्शकांनी बांगलादेशातील प्रमुख वृत्तपत्रे द डेली स्टार आणि प्रथम अली यांच्या कार्यालयांची तोडफोड करत, एका इमारतीला आग लावली.

Comments
Add Comment

Bangladesh : हादीच्या हत्येवरून भारत-बांगलादेशात 'राजनैतिक' ठिणगी; बांगलादेशच्या आरोपांना भारताचे चोख प्रत्युत्तर

ढाका : बांगलादेशातील २०२४ च्या ऐतिहासिक विद्यार्थी उठावाचे नेतृत्व करणारे आणि 'इंकलाब मंच'चे प्रवक्ते शरीफ

Bangladesh Journalist Targeted : २८ पत्रकार, ९ वा मजला अन् गच्चीवर मृत्यूचं तांडव! दंगलखोर दरवाजा ठोकत होते, 'द डेली स्टार'मधील थरार...

ढाका : बांगलादेशातील विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचाराने आता अत्यंत

Osman Hadi : हादीच्या मारेकऱ्यांना भारतातून ओढून आणा, अन्यथा देश ठप्प करू!" इंकलाब मंचाची धमकी, भारत-बांगलादेश संबंधांमध्ये पुन्हा तणावाचे सावट?

ढाका : बांगलादेशातील सत्तापालटाचा चेहरा आणि विद्यार्थी चळवळीचा अग्रगण्य नेता शरीफ उस्मान हादी याची

पाकिस्तानातही 'धुरंधर'ची भुरळ! गेल्या २० वर्षांत सर्वाधिक पायरेटेड करण्यात आलेला बॉलिवूड सिनेमा

कराची: अक्षय खन्ना, रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि सौम्या टंडन अशा तगड्या कलाकारांची फळी असलेला

सौदी अरेबियाने हाकलून दिले ५६ हजार पाकिस्तानी भिकारी

रियाध : तेलाच्या विहिरी तसेच मक्का आणि मदिना यामुळे इस्लाम धर्मियांमध्ये प्रचंड महत्त्व

सौदी अरेबियामध्ये एका वर्षात ३४० लोकांना फाशी देण्यात आली

सौदी अरेबियाने या वर्षी आतापर्यंत ३४० लोकांना मृत्युदंड दिला आहे.ही संख्या गेल्या वर्षीच्या ३३८ च्या विक्रमाला