Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा! अटकेची टांगती तलवार टळली, जामीन मंजूर

मुंबई : नाशिकमधील (Nashik News) बहुचर्चित सदनिका घोटाळा प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरोधात जारी केलेल्या अटक वॉरंटला उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली असून त्यांचा जामीन मंजूर केला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोकाटे यांच्यावर असलेली अटकेची टांगती तलवार आता टळली आहे.



नेमके प्रकरण काय?


१९९५ च्या गृहनिर्माण घोटाळा (सदनिका प्रकरण) संदर्भात नाशिकच्या न्यायालयाने नुकताच निकाल दिला होता. या प्रकरणात कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निकालानंतर कोकाटे हे न्यायालयासमोर हजर न झाल्यामुळे नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात कडक अटक वॉरंट जारी केले होते. पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, कोकाटे यांनी या वॉरंटला आव्हान देत तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.



उच्च न्यायालयाचा निर्णय


मुंबई उच्च न्यायालयात आज या अर्जावर सविस्तर सुनावणी झाली. कोकाटे यांच्या वकिलांनी मांडलेली बाजू आणि प्रकरणाची पार्श्वभूमी विचारात घेत न्यायालयाने कोकाटे यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नाशिक पोलिसांच्या अटकेची कारवाई आता थांबली आहे. तूर्तास कोकाटे यांना न्यायालयाकडून जीवदान मिळाले असले, तरी मूळ शिक्षेच्या विरोधातील त्यांची न्यायालयीन लढाई यापुढेही सुरू राहणार आहे. या निर्णयामुळे कोकाटे समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित