Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा! अटकेची टांगती तलवार टळली, जामीन मंजूर

मुंबई : नाशिकमधील (Nashik News) बहुचर्चित सदनिका घोटाळा प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरोधात जारी केलेल्या अटक वॉरंटला उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली असून त्यांचा जामीन मंजूर केला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोकाटे यांच्यावर असलेली अटकेची टांगती तलवार आता टळली आहे.



नेमके प्रकरण काय?


१९९५ च्या गृहनिर्माण घोटाळा (सदनिका प्रकरण) संदर्भात नाशिकच्या न्यायालयाने नुकताच निकाल दिला होता. या प्रकरणात कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निकालानंतर कोकाटे हे न्यायालयासमोर हजर न झाल्यामुळे नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात कडक अटक वॉरंट जारी केले होते. पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, कोकाटे यांनी या वॉरंटला आव्हान देत तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.



उच्च न्यायालयाचा निर्णय


मुंबई उच्च न्यायालयात आज या अर्जावर सविस्तर सुनावणी झाली. कोकाटे यांच्या वकिलांनी मांडलेली बाजू आणि प्रकरणाची पार्श्वभूमी विचारात घेत न्यायालयाने कोकाटे यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नाशिक पोलिसांच्या अटकेची कारवाई आता थांबली आहे. तूर्तास कोकाटे यांना न्यायालयाकडून जीवदान मिळाले असले, तरी मूळ शिक्षेच्या विरोधातील त्यांची न्यायालयीन लढाई यापुढेही सुरू राहणार आहे. या निर्णयामुळे कोकाटे समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन

मुंबईतील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा

मुंबई: मुंबईमधील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चे कलम १५४ मध्‍ये सुधारणा

मेट्रो-११ मार्गिकेच्या कामाला वेग, 'जायका'कडून ५ हजार ५०० कोटींचे कर्ज

मुंबई : वडाळ्यातील आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो ११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.

तीन कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी मुंबईचे सह-दुय्यम निबंधक निलंबित

मुंबई : शासनाचे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी