अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या २३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव ८ बाद २०१ धावांवर मर्यादित राहिला. भारताचा हा १४ वा टी-२० मालिका विजय असून, २०२५ या वर्षाचा शेवट टीम इंडियाने दणक्यात केला आहे.
भारत U19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत
मुंबई : भारताच्या युवा संघाने अंडर-१९ आशिया चषक २०२५ स्पर्धेत दमदार कामगिरी सुरूच ठेवत उपांत्य फेरीत श्रीलंकेचा आठ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह ...
भारताचा विजय : ३० धावांनी विजय मिळवून मालिका ३-१ ने जिंकली.
स्टार परफॉर्मर्स : हार्दिक पंड्या (६३ धावा, १ विकेट), तिलक वर्मा (७३ धावा), वरुण चक्रवर्ती (४ विकेट).
विक्रमी धावसंख्या : भारताने ५ बाद २३१ धावांचा डोंगर उभारला होता.
फलंदाजीचा थरार : हार्दिक-तिलकची शतकी भागीदारी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात वादळी झाली. अभिषेक शर्मा (३४) आणि संजू सॅमसन (३७) यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. कर्णधार सूर्यकुमार यादव (५) स्वस्तात बाद झाल्यानंतर, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा या जोडीने आफ्रिकन गोलंदाजांची पिसं काढली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अवघ्या ४९ चेंडूत १०५ धावांची तुफानी भागीदारी केली. अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावत एकूण ६३ धावा केल्या. ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण करत ७३ धावांची झुंजार खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेचा पाठलाग : डिकॉकच्या विकेटने फिरला सामना
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर क्विंटन डिकॉकने (६५ धावा, ३५ चेंडू) आक्रमक सुरुवात केली. त्याने हेंड्रिक्ससोबत ६९ धावांची सलामी दिली. मात्र, वरुण चक्रवर्तीने हेंड्रिक्सला बाद करून ही जोडी फोडली. डिकॉक जोपर्यंत खेळत होता, तोपर्यंत आफ्रिकेच्या आशा जिवंत होत्या. जसप्रीत बुमराहने डिकॉकला बाद करताच आफ्रिकेचा डाव गडगडला. यानंतर वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत एडन मार्कराम आणि डोनोव्हन फरेरा यांना सलग चेंडूंवर बाद करून आफ्रिकेचे कंबरडे मोडले. डेव्हिड मिलर (१८) बाद झाल्यावर भारताचा विजय निश्चित झाला.