उमेदवारी अर्ज फेटाळल्यास कोर्टात जाता येणार नाही!

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांआधी राज्य सरकारचा निर्णय


मुंबई : राज्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधी या निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

याविरुद्ध कोर्टात अपील करता येणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत यावेळी मान्यता देण्यात आली.

यापूर्वी हा निर्णय नाकारला गेल्यास उमेदवार जिल्हा न्यायालयात अपील करण्याची मुभा होती. मात्र, वेगवेगळ्या कोर्टात अशी अपिले बराच वेळ प्रलंबित राहत असल्याने निवडणुका वेळेवर आणि ठरलेल्या वेळेत होऊ शकत नव्हत्या. त्यामुळे निवडणुका वेळेत पार पाडता याव्यात म्हणून हा बदल करण्यात आल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल आणि जनहिताला प्राधान्य

मुंबई : केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग च्या विविध

'वाहतूकदारांनी राज्यव्यापी संप मागे घेतला'

मुंबई : अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच

'पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करावा'

मुंबई :  कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे, तर देशातून मोठ्या संख्येने

'अमरावतीमध्ये हनुमान गढी धार्मिक पर्यटन केंद्राची उत्कृष्ट निर्मिती करावी'

मुंबई : अमरावती शहरालगत हनुमान गढी परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. या प्रस्तावित हनुमान गढी

कोल्हापूरमध्ये ३४.३६ हेक्टरवर होणार आयटी पार्क

मुंबई : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन

धारावीतील ४३६ झोपडपट्टीधारकांचे देवनार येथे पुनर्वसन

मुंबई : धारावी येथे १९९९ साली लागलेल्या भीषण आगीत बाधित झालेल्या ‘राजीव गांधी एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण