उमेदवारी अर्ज फेटाळल्यास कोर्टात जाता येणार नाही!

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांआधी राज्य सरकारचा निर्णय


मुंबई : राज्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधी या निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

याविरुद्ध कोर्टात अपील करता येणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत यावेळी मान्यता देण्यात आली.

यापूर्वी हा निर्णय नाकारला गेल्यास उमेदवार जिल्हा न्यायालयात अपील करण्याची मुभा होती. मात्र, वेगवेगळ्या कोर्टात अशी अपिले बराच वेळ प्रलंबित राहत असल्याने निवडणुका वेळेवर आणि ठरलेल्या वेळेत होऊ शकत नव्हत्या. त्यामुळे निवडणुका वेळेत पार पाडता याव्यात म्हणून हा बदल करण्यात आल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

भारतात अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी

नवी दिल्ली : भारतात अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मंजुरी मिळाली

‘व्हीबी-जी राम-जी’ लोकसभेत मंजूर, विरोधकांनी मंत्री शिवराजसिंह चौहानांच्या अंगावर फेकले कागद

नवी दिल्ली : देशातील ग्रामीण जनतेला दोन दशके रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी

भाजप आमदार राम कदमांनी पाच वर्षांनी कापले केस, कारण जाणून घ्याल तर चक्रावून जाल

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी तब्बल पाच वर्षांनंतर

...म्हणून टीव्ही अभिनेत्यावर झाला हल्ला, डोक्यात मारला दंडुका

मुंबई : टीव्ही अभिनेता अनुज सचदेवावर त्याच्याच सोसायटीच्या आवारात पाठीमागून येऊन डोक्यात दंडुका मारण्याचा

पंजाबमध्ये निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर गोळीबार, आप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

पंजाबमधील ब्लॉक कमिटी निवडणुकीत 'आप'ला मोठे यश मिळाले. पण या विजयाच्या आनंदाला हिंसेचे गालबोट लागले. आम आदमी

महसूलमंत्र्यांच्या आश्वासनानंतर महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन स्थगित

मुंबई : महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने आपल्या प्रलंबित आर्थिक आणि सेवाविषयक