उमेदवारी अर्ज फेटाळल्यास कोर्टात जाता येणार नाही!

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांआधी राज्य सरकारचा निर्णय


मुंबई : राज्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधी या निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

याविरुद्ध कोर्टात अपील करता येणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत यावेळी मान्यता देण्यात आली.

यापूर्वी हा निर्णय नाकारला गेल्यास उमेदवार जिल्हा न्यायालयात अपील करण्याची मुभा होती. मात्र, वेगवेगळ्या कोर्टात अशी अपिले बराच वेळ प्रलंबित राहत असल्याने निवडणुका वेळेवर आणि ठरलेल्या वेळेत होऊ शकत नव्हत्या. त्यामुळे निवडणुका वेळेत पार पाडता याव्यात म्हणून हा बदल करण्यात आल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू