मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आला असून, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी अखेर भाजपचे 'कमळ' हाती घेतले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सातव कुटुंबाने काँग्रेसची साथ सोडल्यामुळे राज्याच्या राजकारणात, विशेषतः मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
"राजीव सातव अमर रहे"च्या घोषणा अन् आजच 'कमळ' हाती घेणार? मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून आजची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते ...
बावनकुळे आणि चव्हाणांकडून स्वागत यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "प्रज्ञा सातव यांच्यासारख्या सुशिक्षित आणि कर्तृत्ववान महिला नेत्या भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद दुपटीने वाढली आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी त्या नक्कीच मोलाचे योगदान देतील." तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी "हा प्रवेश केवळ एका व्यक्तीचा नसून हिंगोलीतील एका मोठ्या जनशक्तीचा भाजपमध्ये झालेला प्रवेश आहे," अशा शब्दांत त्यांचे स्वागत केले.
काँग्रेसमधील 'सातव' पर्वाचा अंत दिवंगत राजीव सातव हे काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील मोठे नेते होते. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी त्यांचा वारसा पुढे नेला. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षात होत असलेल्या अंतर्गत कुरघोडी आणि दुर्लक्षामुळे त्यांनी भाजपचा रस्ता धरला. प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर तातडीने हा प्रवेश सोहळा पार पडला, ज्यामध्ये हिंगोली आणि मराठवाड्यातील शेकडो कार्यकर्तेही सहभागी झाले होते. निवडणुकीपूर्वी काँग्रेसची पिछेहाट आगामी निवडणुकांच्या तोंडावर प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसची संपूर्ण संघटनाच आता धोक्यात आली असून, भाजपला तिथे एक सक्षम चेहरा मिळाला आहे. "पक्षात काम करताना सन्मान मिळत नसेल, तर लोकांसाठी काम करण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो," अशा शब्दांत प्रज्ञा सातव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.





