छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या ओव्हरगाव परिसरात जमिनीच्या जुन्या वादातून एका माजी सरपंचाची अकरा जणांच्या टोळीने अमानुषपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण असे मृत व्यक्तीचे नाव असून, या हल्ल्यात त्यांची दोन मुलेही गंभीर जखमी झाली आहेत. जटवाडा रस्त्यावर घडलेल्या या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरगावमधील एका जमिनीच्या ताब्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून दादा पठाण आणि आरोपींमध्ये वाद सुरू होता. याच वादाचे पर्यावसान गुरुवारी रात्री भीषण रक्तरंजित संघर्षात झाले. अकरा जणांच्या एका टोळीने पूर्ण तयारीनिशी पठाण यांच्यावर हल्ला चढवला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण यांच्या कुटुंबातील महिला आरोपींसमोर हात जोडून वाद मिटवण्यासाठी आणि आपल्या माणसांना सोडून देण्यासाठी विनवणी करत होत्या. मात्र, डोक्यात सूडाची भावना भिनलेल्या या टोळीला पाझर फुटला नाही. त्यांनी लाठ्याकाठ्या आणि लाथाबुक्क्यांनी दादा पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर भीषण प्रहार केले. या अमानुष मारहाणीत दादा पठाण यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी रात्रीच एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, तर उर्वरित १० हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात खालील ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू, हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, रामअवतार सागरमल साबू, मोईन इनायत खान पठाण फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली असून, परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एका लोकप्रतिनिधीची अशा प्रकारे दिवसाढवळ्या हत्या झाल्याने ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जमिनीच्या वादातून ११ गावगुंडांचा जटवाडा रोडवर धुमाकूळ
गावातीलच एका जमिनीच्या ताब्यावरून पठाण आणि गावातील काही व्यक्तींमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता. बुधवारी दुपारी जटवाडा रस्त्यावर ही ११ जणांची सशस्त्र टोळी दादा पठाण आणि त्यांच्या मुलांवर तुटून पडली. हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या या गुंडांनी दादा पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कुटुंबातील महिलांनी हल्लेखोरांना रोखण्याचा आणि त्यांचे मन वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण डोक्यात गुंडगिरी आणि सूड भिनलेल्या या टोळीने वृद्ध सरपंचाला जागीच ठार करेपर्यंत मारहाण सुरूच ठेवली. या हल्ल्याच्या घटनेमुळे ओव्हरगाव आणि जटवाडा रोड परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रात्री उशिरापर्यंत एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. मात्र, उर्वरित १० हल्लेखोर सध्या फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. एका ज्येष्ठ माजी लोकप्रतिनिधीची अशा प्रकारे अमानुष हत्या झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जामनगर: दिग्गज फुटबॉल पट्टू लिओनेल मेस्सी याचा भारतीय दौरा संपुष्टात आला असून तो आपल्या मायदेशी परतला आहे. दोन दिवसांच्या भारत भेटी दरम्यान अनेक ...
किरकोळ वाटेचा वाद ठरला काळ
एका छोट्याशा वाटेवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाल्याची धक्कादायक घटना ओव्हरगाव (जटवाडा रोड) येथे घडली आहे. ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण (६८) यांची जमिनीच्या वादातून ११ जणांच्या टोळीने लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, गुन्हेगारांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वाटेच्या वादातून संपूर्ण जमिनीवर डोळा मिळालेल्या माहितीनुसार, दादा पठाण यांचे कुटुंब मूळचे ओव्हरगावचेच रहिवासी असून त्यांची गावातील शाळेजवळ शेती आहे. या शेतजमिनीच्या कडेला असलेल्या एका अरुंद वाटेवरून आरोपींनी सुरुवातीला वाद उकरून काढला होता. मात्र, हा वाद केवळ वाटेपुरता मर्यादित न राहता, आरोपींच्या टोळीने पठाण यांच्या संपूर्ण जमिनीवरच आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली होती. यावरून गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही गटांत तणाव होता. जेसीबी बोलावताच टोळीने गाठले शेत बुधवारी दुपारी दादा पठाण आपल्या जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी घेऊन शेतात गेले होते. काम सुरू असतानाच, पूर्ववैमनस्य मनात धरून अकरा जणांची टोळी हातात शस्त्रे घेऊन तिथे पोहोचली. काही कळण्याच्या आतच या टोळीने पठाण यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी कुटुंबातील महिलांनी हल्लेखोरांचे पाय धरून, हात जोडून विनवण्या केल्या, "आमच्या माणसांना सोडा" अशी आर्त हाक मारली. पण, क्रूरतेने ग्रासलेल्या या टोळीने ६८ वर्षीय वृद्धावर लोखंडी रॉड आणि लाठ्यांनी सपासप वार केले. या हल्ल्यात दादा पठाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे दोन मुलगे गंभीर जखमी झाले आहेत.
'कानून हमारे हाथ में है!'
"कायदा आमच्या खिशात आहे," अशी दर्पोक्ती करत ओव्हरगावच्या ११ गावगुंडांनी माजी सरपंच दादा सांहू पठाण (६८) यांची जटवाडा रोडवर क्रूरपणे हत्या केली. या घटनेने केवळ ओव्हरगावच नव्हे, तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरला आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या या हत्येमध्ये हल्लेखोरांनी केवळ अमानुषपणाच दाखवला नाही, तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःच्याच मालमत्तेची तोडफोड करून स्वतःवरच हल्ला झाल्याचा बनावही रचला. कंपाऊंडचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न आणि मुजोरी घटनेची सुरुवात झाली ती बुधवारी दुपारी, जेव्हा दादा पठाण यांनी आपल्या जमिनीच्या सपाटीकरणासाठी जेसीबी बोलावला होता. मुख्य आरोपी इम्रान खान आणि अफरोज खान यांचे पठाण यांच्या घरासमोरच दुकान आहे. जुन्या वादाचे निमित्त साधून या टोळीने प्रथम दादा पठाण यांची मुले अफसर आणि जुबेर यांच्यावर हल्ला चढवला. आपल्या पतींचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या पत्नींनी दोघांना तातडीने घराच्या कंपाऊंडमध्ये नेले आणि गेटला कुलूप लावून घेतले. बाहेरून महिला हात जोडून विनवण्या करत असताना, ही क्रूर टोळी "कानून हमारे हाथ में है" असे ओरडत लोखंडी रॉडने गेटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होती. अखेर त्यांनी वृद्ध दादा पठाण यांना लक्ष्य केले आणि त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांना बेदम मारहाण केली. स्वतःवरच हल्ला झाल्याचा रचला बनाव धक्कादायक बाब म्हणजे, पठाण यांची हत्या केल्यानंतर आपणच बळी आहोत हे दाखवण्यासाठी या टोळीने स्वतःच्याच दुकानाची तोडफोड केली. आपण हल्लेखोर नसून आपल्यावरच हल्ला झाला आहे, असा खोटा पुरावा निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. मात्र, प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक तपासातून या टोळीचा हा बनाव उघड पडला आहे.






