Friday, January 9, 2026

पन्नासपेक्षा अधिक बिबटे ‘वनतारा’ला नकोत!

पन्नासपेक्षा अधिक बिबटे ‘वनतारा’ला नकोत!

राज्य सरकारसमोर नवा पेच; राज्यात सध्या २ हजार बिबट्यांचा वावर

नागपूर : गुजरातमधील ‘वनतारा’ या प्राणी संरक्षण केंद्राने महाराष्ट्रातील ५० पेक्षा अधिक बिबट्यांना सामावून घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात सध्या २ हजार बिबट्यांचा वावर असल्याने, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला आता नव्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

राज्यात कोल्हापूर, नाशिक, पुणे, नागपूर यांसह अनेक जिल्ह्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण व शहरी भागांत बिबटे दिसू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

नसबंदी करून बिबट्यांचे हल्ले थांबणार नाहीत : बिबट्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी जंगलात शेळ्या-मेंढ्या सोडण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, अजित पवार यांनी हा हास्यास्पद निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिली. बिबट्यांआधी ग्रामीण भागातील लोकच या शेळ्या-मेंढ्यांची शिकार करतील, असे ते म्हणाले. नसबंदी केली, तरी बिबट्यांची नवी पैदास थांबेल. पण, सध्या मानवावर हल्ला करणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त नसबंदी करून होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा