मुंबईतील गोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तोडले महिलांच्या गालांचे लचके

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये घडली आहे. गोरेगावच्या पश्चिमेकडील भागात ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहाटे तसेच रात्री उशिरा रस्त्यावर वावरण्यास नागरिक घाबरत आहेत. कुत्रे टोळक्याने येऊन हल्ला करतात त्यामुळे बचावाची संधीच मिळत नाही, असे स्थानिकांनी सांगितले.


मागील काही दिवसांपासून परिसरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शाळा, वसाहती, बाजारपेठांच्या रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची टोळकी बिनबोभाट वावरताना दिसू लागली आहे. श्वानप्रेमी सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना दूध बिस्किटांपासून ते चिकन मटणापर्यंत खाऊ घालत आहेत. यामुळेच गोरेगावमध्ये कुत्र्यांची संख्या वाढत आहे.


दररोज गोरेगवच्या वेगवेगळ्या भागांतून कुत्रे चावल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या तक्रारी वाढू लागल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Maharashtra Cyber ​​Cell : महाराष्ट्र सायबर सेल कात टाकणार

- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने

Nitesh Rane : चिपी विमानतळाला जलमार्गांनी जोडणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा