मुंबईतील गोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तोडले महिलांच्या गालांचे लचके

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये घडली आहे. गोरेगावच्या पश्चिमेकडील भागात ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहाटे तसेच रात्री उशिरा रस्त्यावर वावरण्यास नागरिक घाबरत आहेत. कुत्रे टोळक्याने येऊन हल्ला करतात त्यामुळे बचावाची संधीच मिळत नाही, असे स्थानिकांनी सांगितले.


मागील काही दिवसांपासून परिसरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शाळा, वसाहती, बाजारपेठांच्या रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची टोळकी बिनबोभाट वावरताना दिसू लागली आहे. श्वानप्रेमी सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना दूध बिस्किटांपासून ते चिकन मटणापर्यंत खाऊ घालत आहेत. यामुळेच गोरेगावमध्ये कुत्र्यांची संख्या वाढत आहे.


दररोज गोरेगवच्या वेगवेगळ्या भागांतून कुत्रे चावल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या तक्रारी वाढू लागल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Water hyacinth : पवई तलावातील जलपर्णी आता कायमची हद्दपार..

तलावाच्या विहार पथाचा विकास सी एस आर निधीतून.. मुंबई: मुंबई महापालिकेच्या पवई तलावात सांडपाण्याच्या

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल