खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या, दैनंदिन कामाचे तासही वाढणार

मुंबई : महाराष्ट्रातील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महायुतीने दिलासा दिला आहे. महायुती सरकारने सेवाशर्तींच्या विनियमनात महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये याबाबतचे अध्यादेश सादर केले. त्यानुसार, खासगी कर्मचाऱ्यांना अधिकची साप्ताहिक सुट्टी मिळणार असून, कामाचे तास आणि ओव्हरटाइममध्ये लवचिकता आणली जाणार आहे.


कामगार मंत्र्यांनी सादर केलेल्या अध्यादेशानुसार, छोट्या व्यावसायिकांना नोंदणी आणि इतर नियमांसाठी १० कर्मचाऱ्यांची मर्यादा आता २० पर्यंत वाढवली जाईल. म्हणजे २० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांना फक्त व्यवसायाची माहिती द्यावी लागेल, पूर्ण नोंदणीची गरज भासणार नाही. मात्र, कर्मचाऱ्यांच्या इतर सुरक्षा आणि त्यासंबंधीचे कायदे कायम राहतील. कामाच्या तासांमध्येही लवचिकता आणली जाईल. आठवड्यात एकूण ४८ तासांच्या मर्यादेत राहून, दैनंदिन कामाचे तास ९ वरून १० पर्यंत वाढवले जातील. यात विश्रांती कालावधीचाही समावेश आहे. हे बदल आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आस्थापनांना मदत करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


 
Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती