खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या, दैनंदिन कामाचे तासही वाढणार

मुंबई : महाराष्ट्रातील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महायुतीने दिलासा दिला आहे. महायुती सरकारने सेवाशर्तींच्या विनियमनात महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये याबाबतचे अध्यादेश सादर केले. त्यानुसार, खासगी कर्मचाऱ्यांना अधिकची साप्ताहिक सुट्टी मिळणार असून, कामाचे तास आणि ओव्हरटाइममध्ये लवचिकता आणली जाणार आहे.


कामगार मंत्र्यांनी सादर केलेल्या अध्यादेशानुसार, छोट्या व्यावसायिकांना नोंदणी आणि इतर नियमांसाठी १० कर्मचाऱ्यांची मर्यादा आता २० पर्यंत वाढवली जाईल. म्हणजे २० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांना फक्त व्यवसायाची माहिती द्यावी लागेल, पूर्ण नोंदणीची गरज भासणार नाही. मात्र, कर्मचाऱ्यांच्या इतर सुरक्षा आणि त्यासंबंधीचे कायदे कायम राहतील. कामाच्या तासांमध्येही लवचिकता आणली जाईल. आठवड्यात एकूण ४८ तासांच्या मर्यादेत राहून, दैनंदिन कामाचे तास ९ वरून १० पर्यंत वाढवले जातील. यात विश्रांती कालावधीचाही समावेश आहे. हे बदल आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आस्थापनांना मदत करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


 
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य

Mumbai News : पवई-विहार तलाव परिसरातील अवैध बांधकामांवर खासदार रवींद्र वायकर आक्रमक; केंद्राकडे तातडीच्या कारवाईची मागणी

मुंबई : पवई, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध बांधकामांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली