खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या, दैनंदिन कामाचे तासही वाढणार

मुंबई : महाराष्ट्रातील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महायुतीने दिलासा दिला आहे. महायुती सरकारने सेवाशर्तींच्या विनियमनात महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये याबाबतचे अध्यादेश सादर केले. त्यानुसार, खासगी कर्मचाऱ्यांना अधिकची साप्ताहिक सुट्टी मिळणार असून, कामाचे तास आणि ओव्हरटाइममध्ये लवचिकता आणली जाणार आहे.


कामगार मंत्र्यांनी सादर केलेल्या अध्यादेशानुसार, छोट्या व्यावसायिकांना नोंदणी आणि इतर नियमांसाठी १० कर्मचाऱ्यांची मर्यादा आता २० पर्यंत वाढवली जाईल. म्हणजे २० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांना फक्त व्यवसायाची माहिती द्यावी लागेल, पूर्ण नोंदणीची गरज भासणार नाही. मात्र, कर्मचाऱ्यांच्या इतर सुरक्षा आणि त्यासंबंधीचे कायदे कायम राहतील. कामाच्या तासांमध्येही लवचिकता आणली जाईल. आठवड्यात एकूण ४८ तासांच्या मर्यादेत राहून, दैनंदिन कामाचे तास ९ वरून १० पर्यंत वाढवले जातील. यात विश्रांती कालावधीचाही समावेश आहे. हे बदल आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आस्थापनांना मदत करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


 
Comments
Add Comment

Nashik Simhastha 2027 : कुंभ २०२७साठी एआयची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा, जागतिक कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली

hydroelectric project : उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

मुंबई : जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री