नागपूरमध्ये महायुतीची महाबैठक! अंतर्गत वादांना मिळणार पूर्णविराम?

नागपूर: महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला भाजप आणि शिवसेनेतील फुटीबाबत जे चित्र निर्माण झाले होते, ते आता लवकरच बदलणार आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात काल (८ डिसेंबर) रात्री उशिराने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ज्यात महायुतीतील मुख्य नेत्यांसह इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक असल्याचे समजते.


या बैठकीत महायुतीमध्ये सुरू असलेल्या कुरघोड्या, पक्षप्रवेश, अंतर्गत धुसफूस या वादांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. जवळजवळ दीड तासाच्या चर्चेनंतर, महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका महायुती म्हणून संयुक्तपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण, पक्षप्रवेश करून घेताना महायुती आणि मित्र पक्ष दुखावले जाणार नाही, याचा प्रत्येकाने विचार करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता महायुतीमधील वाद आता थांबणार असल्याचा अंदाज आहे.




याप्रमाणेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनापासून ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पुढचे दोन महिने निवडणुका आहेत, काळजी घ्यावी लागेल, रोज अधिवेशनात हजेरी लावा, शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा अशा सूचना या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना दिल्या आहेत.

Comments
Add Comment

दादरमध्ये सलग चौथ्या दिवशी कारवाई जोरात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या फेरीवाल्यांविरोधात प्रत्येक विभागात धडक कारवाई सुरु

मुंबईची खड्डेमुक्तीच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत ६३ टक्के सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची कामे पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वाटचाल करत मुंबई महानगरपालिकेच्या

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या राज्यस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांसमोर

भारताने ओलांडला २०० चा टप्पा, नामिबियाला दिले मोठे आव्हान

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने २० षटकांत नऊ बाद २०९