उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन वनराई बंधारे करणार

पंचायत समिती २१ बंधारे, कृषी कार्यालय बांधणार ५०


शैलेश पालकर पोलादपूर : उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याचा पूर्वानुभव लक्षात घेता पंचायत समितीने ग्रामपंचायतींमार्फत २१ वनराई बंधारे बांधले असून तालुका कृषी विभागातील कृषी सहायकांना प्रत्येकी ५ असे एकूण १० सहायकांमार्फत ५० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात आले.


पोलादपूर तालुक्यात उन्हाळ्यात गुरांच्या पाण्यासोबतच कपडे, भांडी धुण्याच्या तसेच आवश्यक वाटल्यास पिण्याच्या, आंघोळीच्या पाण्यासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरत आहे. मात्र, निवडणुकांच्या काळात वनराई बंधारे बांधण्याचा विसर पडत असल्याने उन्हाळयात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. पोलादपूर तालुक्यात पंचायत समितीने आतापर्यंत १७ ग्रामपंचायतींच्या मार्फत २१ बंधारे बांधल्याची माहिती गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांच्यावतीने कृषी विस्तार अधिकारी मंगेश साळी तसेच अरूण धीवरे यांनी दिली. यामध्ये तुर्भे खुर्द, धामणदिवी, तुर्भे बुद्रुक, काटेतळी, तुर्भे खोंडा, कोतवाल खुर्द, देवपूर, धारवली, आडावळे बुद्रुक, देवळे, कुडपण बुद्रुक, परसुले आणि गोवेले या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १ तर सडवली, दिविल, वाकण आणि बोरघर या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी २ याप्रमाणे २१ वनराई बंधारे बांधले आहेत. दरम्यान, पोलादपूर तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली १० कृषी सहायकांच्या माध्यमातून प्रत्येकी ५ तर तालुक्यात लोकसहभागातून ५० बंधारे उभारण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार आणि तहसिल कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांच्या समन्वयातून विविध विकास कामांसाठी वापरण्यात आलेली सिमेंटची रिकामी पोती गोळा करण्यात येऊन या वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येते. वनराई बंधाऱ्यांमुळे उन्हाळयात बंधाऱ्याच्या परिसरातील विहिरी तसेच बोअरवेलच्या पाणीपातळीमध्ये वाढ होते.

Comments
Add Comment

आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

फक्त डिजिटल पडताळणीसाठी अनिवार्य मुंबई : सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम

एलन मस्क यांचे सॅटेलाईट इंटरनेट भारतात लाँच

भारतात स्टारलिंगचे प्लॅन्स हे ८ हजार ६०० रुपयांपासून सुरू वॉशिंग्टन : प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांची

सतत स्क्रीनचा वापर करून डोळे थकले असतील तर न चुकता खा हे आठ पदार्थ, चष्म्याचा नंबरही होईल आपोआप कमी

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीत लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या स्क्रीनसमोर तासन्‌तास काम करणे महत्वाचे झाले आहे. याचा

बाणेरमधील आरोपीला दिल्लीतून पाच महिन्यांनंतर अटक

पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची