अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून गदारोळ;महाविकास आघाडीच्या काळात अधिवेशन फक्त पाच दिवसाचं होतं !!तेही मुंबईतच

नागपूर: नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारला अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. पटोले म्हणाले, "सरकारला एवढी घाई काय आहे? हे अधिवेशन कृपया वाढवावे आणि किमान दोन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे." या मागणीला उत्तर देताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांना आठवण करून दिली की, "आपण कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला काही कारणास्तव उपस्थित नव्हता." यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी, "आम्ही सभागृहामध्ये ८ ते १९ डिसेंबरपर्यंत अधिवेशन घ्यावे, असे बोललो होतो," असे स्पष्ट केले.

या चर्चेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतली. त्यांनी पटोले यांच्या मागणीवर आक्षेप घेत म्हटले की, "अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण पुरवणी मागण्या दाखवतो. गेल्या २५ वर्षांत मी एकमेव मुख्यमंत्री आहे, ज्याने नागपूरमध्ये सर्वाधिक कालावधीचे अधिवेशन घेतले." पटोले यांच्यावर टीका करताना फडणवीसांनी पुढे सांगितले की, "नाना पटोले यांच्या काळात मुंबईतही तीन आणि चार दिवसच अधिवेशन चालले होते." अखेरीस, नाना पटोले यांनी पुन्हा एकदा अधिवेशन वाढवण्याची मागणी केली असता, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी "गरज पडल्यास यावर विचार करू," असे आश्वासन दिले.
Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस