अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला ११५ हून अधिक वर्ष पूर्ण झाली. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून पोर्ट ब्लेअर येथे ‘सागरा प्राण तळमळला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बियोदनाबाद येथे सावरकरांच्या भव्य पुतळ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात येणार आहे. अंदमानमधील श्री विजया पुरम येथे मुंबईतील ‘व्हॅल्युएबल ग्रुप’च्या वतीने १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता ‘सागरा प्राण तळमळला’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने, बियोदनाबाद येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.‘






