संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची संविधानाच्या डिजिटल चित्ररथाद्वारे मानवंदना

संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 


मुंबई: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे. या चित्ररथाचे आज दिनांक ०६ डिसेंबर, २०२५ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात, प्रभादेवी मुंबई येथे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, श्री बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, श्रीमती मीनल जोगळेकर, संचालक पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व इतर मान्यवर उपस्थित होते.




हा चित्ररथ राज्यात विविध ठिकाणी फिरणार आहे. या चित्ररथामध्ये संविधानाची माहिती, संविधानाच्या मुलतत्त्वावरील माहिती, महत्त्वाची घडामोडी व लोकशाहीच्या मुल्यांवरील कलात्मक सादरीकरण व याबाबतचे प्रदर्शन बघायला मिळेल. या चित्ररथाद्वारे संविधान बाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. संविधानाची माहिती सर्वसामान्यांना माहित व्हावी, या उद्देशाने या चित्ररथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. राज्यातील जास्तीत जास्त जनतेने या चित्ररथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
Comments
Add Comment

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे