डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. पोलीस उपायुक्त आर. रागसुधा यांच्या अध्यक्षतेखाली हे पथक संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. गौरीच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.


डॉ. गौरी यांची आत्महत्या नसून ही सुनियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. “गौरी ही लढाऊ आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी मुलगी होती. ती कधीही आत्महत्या करू शकत नव्हती. हे प्रकरण हत्येचे आहे. आत्महत्येनंतर अनंत गर्जे हाच गौरीला रुग्णालयात घेऊन गेला होता, मात्र तिथून तो फरार झाला. त्याने गौरीच्या आई-वडिलांना आत्महत्येची माहिती दिली”, असा दावा गौरीच्या आईने केला आहे.


डॉ. गौरी यांच्या आई-वडिलांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी दिले. भेटीनंतर गौरीच्या आईंने माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “आमचे जे काही प्रश्न सुटत नव्हते, त्याची सविस्तर चर्चा आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत केली. त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करू आणि शेवटपर्यंत सोबत राहू असे आश्वासन दिले आहे. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, की ते जे बोलले ते करतील.”

Comments
Add Comment

'अजित पवारांच्या विमान अपघातावरून राऊत, रोहित पवारांची स्टंटबाजी'

- भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रखर टीका अजितदादांच्या निधनानंतर प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राऊत

Budget Session : आरोग्य केंद्रात आता 'कायाकल्प'; ४६ पैकी २८ केंद्रांचा कायापालट होणार, मंत्री बोर्डीकर यांचे आश्वासन

मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या प्रसूती प्रकरणाचे

कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही, कार्नी सरकारची अधिकृत भूमिका

ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कार्नी भारत दौऱ्यात

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत