डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. पोलीस उपायुक्त आर. रागसुधा यांच्या अध्यक्षतेखाली हे पथक संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. गौरीच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.


डॉ. गौरी यांची आत्महत्या नसून ही सुनियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. “गौरी ही लढाऊ आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी मुलगी होती. ती कधीही आत्महत्या करू शकत नव्हती. हे प्रकरण हत्येचे आहे. आत्महत्येनंतर अनंत गर्जे हाच गौरीला रुग्णालयात घेऊन गेला होता, मात्र तिथून तो फरार झाला. त्याने गौरीच्या आई-वडिलांना आत्महत्येची माहिती दिली”, असा दावा गौरीच्या आईने केला आहे.


डॉ. गौरी यांच्या आई-वडिलांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी दिले. भेटीनंतर गौरीच्या आईंने माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “आमचे जे काही प्रश्न सुटत नव्हते, त्याची सविस्तर चर्चा आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत केली. त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करू आणि शेवटपर्यंत सोबत राहू असे आश्वासन दिले आहे. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, की ते जे बोलले ते करतील.”

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर, अंबरनाथमध्ये शिवसेनेला दिलासा; भाजपाला मोठा धक्का

अंबरनाथ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल